नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 26 जुलै रोजी मुंबई येथे ठाकरे बंधूंनी संयुक्त आंदोलनाची घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत संयुक्त आंदोलनाची घोषणा केली. 26 जुलै, रविवारी सकाळी मुंबई येथे शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिर असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात विद्यार्थी, तरुण आणि विविध सामाजिक घटक सहभागी होतील, (Thackeray brothers) अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून महाविकास आघाडी मधील घटक पक्षही या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मनातील संताप आणि अन्यायाविरोधातील भावना देशासमोर मांडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चाची सांगता सिद्धीविनायक मंदिरात होईल. उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुबुद्धी मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर योग्य निर्णय व्हावा, यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाईल, असे सांगितले. (Thackeray brothers) तसेच या आंदोलनात कोणत्याही पक्षाचे झेंडे किंवा राजकीय शक्तीप्रदर्शन होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहार, शेतकरी आंदोलन आणि मणिपूर येथील घटनांचा उल्लेख करत केंद्र सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या समस्या वेळेत समजून घेतल्या असत्या, त्यांच्याशी संवाद साधला असता, तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असे ते म्हणाले. देशभरातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण व्यवस्थेबाबत नाराजी वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी 26/11 मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलेल्या वक्तव्याची आठवण करून देत त्या प्रकरणात त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला होता, असे सांगितले. (Thackeray brothers) त्याच धर्तीवर नीट पेपरफुटी प्रकरणातही जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आता केवळ एका मंत्र्यापुरती मर्यादित राहिलेली नसून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या भूमिकेशी जोडली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?