इचलकरंजी : येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज या इचलकरंजी शहरातील पहिल्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने (वहिनी) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाले. उद्घाटन समारंभास संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे, संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य सिताराम गवळी, संस्थेचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, संस्थेचे कोल्हापूर जिल्हा विभाग प्रमुख मा. श्रीराम साळुंखे, इचलकरंजी बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. रामकृष्ण तोष्णीवाल, बार कौन्सिल महाराष्ट्र – गोवाचे माजी चेअरमन ॲड. विवेक घाटगे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे आपल्या मनोगतात म्हणाले कि, “माझ्या जडणघडणीत डी. के. ए. एस. सी. कॉलेजचे योगदान मोठे आहे. माझ्यातील नेतृत्व गुणांचा विकास याच महाविद्यालयातील व्यासपीठावरून झाला आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजींच्या शिक्षण विचारात दूरदृष्टी असलेली दिसते. मळलेली वाट न निवडता स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण करण्याचे धाडस आणि बळ या महाविद्यालयाने आणि बापूजींनी आम्हाला दिले. बदलत्या शिक्षण प्रवाहात विधी महाविद्यालयाची स्थापना करून संस्थेने ज्ञान शिदोरीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे.”
माजी खासदार निवेदिता माने वहिनी यांनी आपल्या मनोगतात, ” इचलकरंजी शहरात दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजची स्थापना ही इचलकरंजी शहराच्या शैक्षणिक विकासाची नांदी आहे. या कॉलेजच्या माध्यमातून येथील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान मिळणार असून नामवंत वकील व न्यायाधीश निर्माण होतील व ते आपल्या शहराचा नावलौकिक वाढवतील असा विश्वास मला वाटतो. ” अशा भावना व्यक्त केल्या.
अध्यक्षीय मनोगतामध्ये मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांनी ” पारंपारिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक महाविद्यालये स्थापन करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. हे व्यावसायिक कौशल्य या विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळेल. समाजाला उध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणारे विद्यार्थी घडवणे गरजेचे आहे. असे विद्यार्थी या कॉलेजच्या माध्यमातून निर्माण होतील आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक विचार आत्मसात करून सुसंस्कारी वकील, न्यायाधीश निर्माण होतील.” असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी ॲड. रामकृष्ण तोष्णीवाल, ॲड. विवेक घाटगे, मा. श्रीराम साळुंखे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी विधी महाविद्यालयाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या श्री. हितेंद्र साळुंखे, ॲड. हितेश राणिंगा, प्राचार्या ॲड. बागडी मॅडम, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर, प्राचार्य डॉ. एस. के. खाडे, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य विरेन भिर्डी, श्री. अमित आव्हाड, श्री. मयूर बोरगे, ॲड. तौफिक नाईकवडे, श्री. अजित भोसले, श्री. अजहर दाडीवाले, प्रा. चेतन पाटील, श्री. डी. आर. पाटील, श्री. रमेश रावण, प्रा. रिटा रॉड्रीक्स इत्यादींचा सत्कार करण्यात आला.
दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी रचलेल्या संस्था प्रार्थनेने समारंभाचा शुभारंभ होऊन सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या फलकाचे अनावर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सीईओ मा. कौस्तुभ गावडे यांनी लॉ कॉलेजच्या स्थापनेमागील उद्देश व विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधी विशद केल्या. समारंभाचे आभार संस्थेच्या सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अतिष पाटील यांनी केले. सदर उद्घाटन सोहळ्यास जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील, ॲड. इंद्रजीत चव्हाण, ॲड. अमित सिंग, मा. गणबावले, ॲड. शाहू काटकर तसेच संस्थेचे आजी-माजी आजीव सेवक, पदाधिकारी, विविध शाखांचे शाखाप्रमुख, गुरुदेव कार्यकर्ते, इचलकरंजी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, पत्रकार, छायाचित्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.