वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. (abated)याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खडसे यांनी ही औपचारिक मागणी केली आहे.वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं आहे. तिच्या मृत्यूस पती शशांक, सासरे राजेंद्र, सासू लता व नणंद करिश्मा हगवणे हे कारणीभूत ठरले असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे.

या प्रकरणात वैष्णवीच्या जावेवरही मारहाणीचा आरोप असून तिच्या कुटुंबीयांनी सहा महिन्यांपूर्वी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीची दखलच घेण्यात आली नसल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, “रुपाली चाकणकर राष्ट्रवादी पक्षाच्या जबाबदाऱ्या (abated)आणि महिला आयोगाच्या कामात समतोल साधू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा.”खडसे यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादीशी संबंधित प्रकरण असल्यास चाकणकर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून चाकणकरांना हटविण्याची मागणी केली आहे.

हे पहिलं प्रकरण नाही जिथे खडसे आणि चाकणकर एकमेकांवर टीका करत आहेत. यापूर्वी देखील रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर ‘दाल में कुछ काला है’ (abated)अशी थेट टीका केली होती. त्यावेळीही चाकणकरांनी प्रत्युत्तर देत, “माझं नाव घेतलं की विरोधकांची बातमी होते,” असा टोला लगावला होता.आता रोहिणी खडसे थेट राजीनाम्याची मागणी करत असल्यामुळे हे प्रकरण अधिकच गाजण्याची शक्यता आहे. यावर आता रुपाली चाकणकर काय उत्तर देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला रामराम चाहत्यांना धक्का..!
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया