आम्ही थंड होणार नाहीत उद्धव ठाकरे यांचा सरकारला मोठा इशारा, देशात?

उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी फुटीर खासदारांना नरेंद्र मोदी भेटले, यावरून त्यांनी जोरदार निशाणा साधला. आता आम्ही थंड बसणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांनी सरकारवर मोठा आरोप केला, सरकार बदलण्याची वेळ आता आल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, गेल्या चार वर्षापासून केसची सुनावणी सुरू झाली आहे. मी आजपर्यंत कधीही आणि या पुढेही हे प्रकरण न्यायालयात असल्याने बोललो नाही. बोलणार नाही. संविधानाप्रमाणे निकाल द्यावा. लागेल याची खात्री आहे. न्यायालयाबद्दल विश्वास आणि खात्री आहे. पण देशात जे वातावरण आहे, त्याबद्दल बोलायचं आहे.पावसाळा सुरू आहे. शाळेत मतलई वाऱ्याचा प्रकार ऐकला होता. (government) या वाऱ्यामुळे जमीन थंड होते. आता देशात मतलबी वारे सुरू आहे. विरोधातून सत्ताधाऱ्यांकडे लोक जातात. त्यांना वाटतं विरोधक थंड होतील. पण तसं होणार नाही. देशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे.

आम्ही थंड होणार नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारला मोठा इशारा दिला. उद्धव ठाकरेंनी म्हटले, गेले महिने दोन महिने संपूर्ण जगात देशातील तरुणाईंची जेंनजीने सरकारला कसं गुडघ्यावर आणलं त्याची चर्चा सुरू आहे. या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार केले. (government) जालियनवाला बागेच्या हत्याकांडाची आठवण व्हावी असा अत्याचार केला. प्रसिद्ध क्रिकेटपटूने गूपचूप उरकले लग्न, अभिनेत्रीसोबतच्या फोटोंनी वेधले लक्ष वाईट पद्धतीने ट्रोल केलं, देशद्रोही संबोधलं. एवढं करून त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानाची तयारी नाही. गृहमंत्र्यांची हिंमत नाही. देश पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सवाल करत आहे. तुम्ही आत्याचार का केला. एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून चालणार नाही. आता सिस्टिम बददली पाहिजे. सरकार बदललं पाहिजे.

उद्धव ठाकरे यांनी थेट आता सरकार बदलण्याची वेळ आल्याच म्हटले. जेंनजीच्या आंदोलनात उद्धव ठाकरे सरकारवर टीका करताना दिसले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांची भेट घेतली. (government) यावेळी त्यांनी या खासदारांसोबत स्वतंत्र संवाद साधल्याचीही माहिती मिळतंय. त्यावरच उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी मोदींना वेळ नाही, फुटीर खासदारांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?

सांगली बलात्कार व लूटप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी?

 शिराळ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा?