राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची चर्चा करण्याची गरज नाही. या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्षे दोन्ही बाजूंच्या प्रवाहात आहे. मला माहिती आहे दोघांच्या एकमेकांविषयीच्या भावना काय आहेत, या सगळ्याची जाणीव मलासुद्धा आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात. उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं आपल्याकडून नुकसान होऊ नये त्यासाठी त्यांची भूमिका
अशी मैत्री संपुष्टात येत नाही, राज ठाकरे आणि आमची मैत्री संपली का? आम्ही एकमेकांच्या नकला केल्या. शरद पवार आणि बाळासाहेब टीका टिपण्णी करायचे. शेलार आणि राज ठाकरे यांच्यात कोणत्या प्रकारचं भांडण आहे? त्याला काही वैयक्तिक किनार आहे का? राजकीय भांडणामुळे मैत्री तुटत नाही. त्याचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.