भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंह याने 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपल्या पसंतीचा 15 सदस्यीय भारतीय संघ निवडला आहे. या संघाची धुरा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधताना युवराजने ईशान किशनला मात्र संघातून वगळले असून यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांना स्थान दिले आहे.

युवराज सिंहने निवडलेल्या संभाव्य संघात शुभमन गिल याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. (Indian team) त्याच्यासोबत रोहित शर्मा, विराट कोहली , केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे.
संघाच्या फलंदाजीची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी करावी, तर तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहलीला पसंती देण्यात आली आहे. (Indian team) त्यानंतर श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. गोलंदाजीमध्ये रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे इंग्लंड दौऱ्यावर नुकताच विकेटकीपर म्हणून खेळलेल्या ईशान किशनला युवराजने या संभाव्य संघात स्थान दिलेले नाही.
युवराजने निवडलेल्या संघात यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांचा समावेश असल्याने त्याची निवड चर्चेचा विषय ठरली आहे. त्याचवेळी ईशान किशनला बाहेर ठेवण्यात आले आहे. या संभाव्य 15 खेळाडूंमध्ये शुभमन गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी असेल. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांसारख्या अनुभवी खेळाडूंसोबत यशस्वी, पंत आणि हर्षित राणा यांसारख्या युवा पर्यायांनाही संघात जागा देण्यात आली आहे. त्यामुळे युवराजने अनुभव आणि नव्या पिढीतील खेळाडूंचा मेळ साधण्याचा प्रयत्न केल्याचे या निवडीवरून दिसते.
दरम्यान, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027 च्या स्पर्धेच्या रचनेतही बदल करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ऑक्टोबर 2027 मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 14 संघ सहभागी होतील. संघांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल आणि प्रत्येक गटात सात संघ असतील. साखळी फेरीत प्रत्येक संघ सहा सामने खेळेल. (Indian team) त्यानंतर प्रत्येक गटातील तळाचे दोन संघ स्पर्धेबाहेर जातील, तर दोन्ही गटांतील अव्वल तीन संघ ‘सुपर-7’ फेरीत दाखल होतील. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल. या नव्या फॉरमॅटमुळे भारत-पाकिस्तानमध्ये तीन सामने होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही स्पर्धा 4 ऑक्टोबर 2027 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?
नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?