आज महाराष्ट्रसह देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये मतदानाचा मोठा दिवस आहे. महाराष्ट्रात राहुरी आणि बारामती या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दिग्गज नेत्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागांवर होत असलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले रिंगणात आहेत,(Voting) तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गोविंद मोकाटे यांनी आव्हान उभे केले आहे. कर्डिले घराण्याचा वारसा आणि मोकाटे यांची राजकीय रणनीती यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून बारामती तालुक्यातील एकूण ४७८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू झाली आहे.
मतदानापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले आणि अभिवादन केले. स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. (voting) दरम्यान, अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “२०२९ ला मी उमेदवार असावे असे बारामतीकरांना वाटते, ही लोकांची इच्छा आहे. पण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहण्याची माझी इच्छा आहे.”
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्येही रणधुमाळी केवळ महाराष्ट्रच नव्हे, (voting) तर देशाच्या इतर भागांतही आज मतदानाची धामधूम आहे. पश्चिम बंगाल येथील १५२ जागांसाठी आज मतदानाचा पहिला टप्पा पार पडत आहे. लाखो मतदार आज आपला कौल ईव्हीएममध्ये बंद करतील. १७ व्या विधानसभेसाठी तामिळनाडूतील सर्व २३४ जागांवर एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सुमारे ५७.३ दशलक्ष मतदार आज राज्याचे पुढील सरकार ठरवण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. महाराष्ट्रातील दोन्ही पोटनिवडणुकांचे निकाल राज्याच्या पुढील राजकीय समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. मतदानाची प्रक्रिया सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
हेही वाचा
मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला
अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन
शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान