बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडीत जागावाटपावरुन(political news) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. पण त्याचवेळी काँग्रेसने मात्र बिहारमधील काही महत्त्वाच्या जागांवर दावा केला केला आहे. राजद आणि काँग्रेसमधील हा वाद सोडवण्यासाठी राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांना हे प्रकरण सोडवण्यासाठी सक्रिय केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अखिलेश सिंह लालू प्रसाद यादव यांच्या संपर्कात आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश सिंह उद्या संध्याकाळी लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊन या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. तसेच, महाआघाडीतील जागावाटपाचा (political news)फॉर्म्युलाही निश्चित सोडवणार असल्याची माहिती आहे. तर राजद नेते तेजस्वी यादव आज संध्याकाळी उशिरा दिल्लीला जाऊ शकतात आणि ते राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या बैठकीत महाआघाडीच्या आगामी निवडणूक रणनीती आणि जागावाटपाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी-लेनिनवादी (सीपीआय-एमएल), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) यांनी आरजेडी आणि काँग्रेससोबत निवडणूक लढवली. त्यावेळी, आरजेडीला १४४, काँग्रेसला ७०, सीपीआय-एमएलला १९, सीपीआय ६ आणि सीपीएमला ४ जागा देण्यात आल्या होत्या.

युतीच्या जागावाटपाच्या घोषणेनंतर, मुकेश साहनी पत्रकार(political news) परिषदेतून बाहेर पडले आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये सामील झाले. भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्यांना त्यांच्या कोट्यातून ११ जागा वाटप केल्या आहेत. मुकेश साहनी हे यापूर्वी महाआघाडीचे दीर्घकाळ सदस्य होते. शिवाय, झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष (आरएलजेपी) देखील जागा दिल्यास आघाडीमध्ये सामील होण्यास तयार असल्याचे समजते.

वादग्रस्त जागांपैकी, व्हीआयपी कडून आरजेडीच्या शेखपुरा, सिमरी बख्तियारपूर, भाबुआ, बरहरा, महिसी आणि गौराबरम जागांवर दावा करण्यात आला आहे. तर काँग्रेसने आरजेडीच्या बैसी, बहादुरगंज आणि सहरसा जागांची मागणी केली आहे. आरजेडीने सीपीआय(एमएल)च्या घोसी आणि पालीगंज जागांवर दावा केला आहे. सीपीआयने आरजेडीच्या हरलाखी जागांवर दावा केला आहे. झामुमो कटोरिया आणि मनिहारी जागा जिंकेल. अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

विश्वास पूर्ण मैत्री करार

तान्या अमालच्या प्रेमात? केली किस…मालतीने केले आरोप, Video Viral

ब्रेकिंग : पालिका निवडणुका रंगतदार होणार; जैन समाजाकडून ‘शांतीदूत जनकल्याण पक्षाची’ घोषणा