‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं

बीड जिल्ह्यात सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या घटनेत धक्कादायक बाब समोर आली आहेत. वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी(wife) माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराने मयत व्यक्तीला दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असणारे राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये 10 टक्के व्याजाने उसने घेतले होते. याची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिनाप्रमाणे करण्यात आली. मात्र, पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता. तुझ्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी(wife) माझ्या घरी आणून सोड, असे म्हणत सावकाराने राम फटाले यांचा मानसिक छळ केला. वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यांनी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.

दरम्यान या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सावकार डॉ. लक्ष्मण जाधव आणि त्याच्या पत्नीसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल असून तिघेजण अटकेत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. यातील मुख्य संशयित आरोपी डॉ.लक्ष्मण जाधव हा भाजपाचा पदाधिकारी आहे. जिल्ह्यात महिनाभरापूर्वीच सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली होती. ही प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एकाने आत्महत्या केल्याने सावकारीचा प्रश्न समोर आला आहे. यासंदर्भात बीड पोलीस आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राम फटाले यांचं डोळ्यात पाणी आणणारं पत्र
प्रिय आई आणि पप्पा
सुजय, गौरी आणि रेणुका

मी चांगला मुलगा, पती आणि वडील होऊ शकत नाही. तरी मला माफ करा. रेणुका तुला माझी जागा घेऊन माझे आई-वडील, सुजय आणि गौरी यांची काळजी घ्यावी लागेल. शाम भाऊ लखन माझे मुले आणि बायको, आई-वडील यांना सांभाळा. मला माफ करा, तुम्हा सर्वांचा राम.

माझे आई-वडील यांच्याकडे माझ्या मातीसाठी पैसे नाहीत. माझी माती समाजाकडून वर्गणी काढून करावी. माझं दहावं, तेरावं आणि चौदावं करु नका. माझं वर्षश्राद्ध करु नका, ही माझी इच्छा आहे. रेणुका मी तुझ्यावर माझ्या परिवाराची जबाबदारी देऊन जात आहे. तुला यापुढे खंबीरपणे सर्वांशी झगडावे लागेल.

तुझा राम

मी आत्महत्या करण्यास कारणीभूत असलेली व्यक्ती डॉ. लक्ष्मण जाधव व त्यांची पत्नी वर्षा जाधव आहेत. त्यांनी मला मानसिक त्रास दिला व माझा छळ केला. मी त्यांच्याकडून व्याजाने उसने रुपये घेतले होते. मी त्यांना रक्कम परत केली होती. पण माझे चेक बोर्ड परत दे म्हणालो अजून रक्कम दे. माझे बँक खाते, पत्नी आणि मुलीचे बँक खाते बँक ऑफ बडोदामध्ये आहे. साहेब त्यांच्याकडून सर्व रक्कम परत घेऊन माझ्या परिवाराला परत देण्यात यावी, ही नम्र विनंती. गेल्या सहा-सात वर्षांपासून मी त्यांना रक्कम देत आहे. तरी माझे बँक खाते तपासून रक्कम परत देण्यात यावी. ही आपणास विनंती.

हेही वाचा :

स्वस्तात पूर्ण होईल नेपाळची सफर; फक्त ‘या’ Travel Tips लक्षात ठेवा

आठवड्याच्या सुरुवातीला काय आहेत सोन्याचे भाव? जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर