दैनंदिन जेवणात चपात्यांचा समावेश हा असतोच.(refrigerator)अनेक घरांमध्ये दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी रोज चपात्या बनवल्या जातात. मात्र, रोज ताजं पीठ मळणं शक्य नसल्याने अनेकजण एकावेळी जास्त पीठ तयार करून ते फ्रिजमध्ये ठेवतात. काहीवेळा उरलेलं पीठ देखील पुढील वेळी वापरण्यासाठी साठवले जातं. मात्र, अशा फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाबद्दल अनेक शंका आणि गैरसमज आहेत. काही लोकांचा दावा आहे की फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ विषारी बनते, तर काहींच्या मते त्याचं पोषणमूल्य कमी होतं. या सगळ्यात खरं काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपण तज्ज्ञांचे मत जाणून घेणं गरजेचं आहे.

पोषणतज्ज्ञांच्या मते, फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ विषारी बनते ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. खरं तर, फ्रिजमधील तापमान सुमारे ४ अंश सेल्सियसच्या आसपास असते, जे बॅक्टेरियांच्या वाढीस आळा घालते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवलेले पीठ सुरक्षितच असते. मात्र, यामध्ये ‘योग्य साठवण’ ही अत्यंत महत्वाची बाब आहे. (refrigerator)तज्ज्ञ सांगतात की, पीठ हवाबंद डब्यात थोडंसं तेल लावून ठेवावं. यामुळे त्यावर कोणताही ऑक्सिडेशनचा परिणाम होत नाही आणि त्याचा ताजेपणा टिकून राहतो.

तसेच, फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ पोषणदृष्ट्याही हानिकारक नसते. लोकांमध्ये असा गैरसमज आहे की अशा प्रकारे साठवलेले पीठ त्यातील प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटक गमावते. (refrigerator)मात्र पोषणतज्ज्ञ याला नकार देतात. त्यांच्यानुसार, या पिठातील प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर हे ताज्या पिठाइतकेच टिकून राहतात. एवढंच नाही तर, काही अँटीऑक्सिडंट्स जसे की फेरुलिक अॅसिड अधिक प्रभावीपणे शरीरात शोषले जातात.

तरीही, काही गोष्टींचं काटेकोरपणे पालन केल्यास धोका अजून कमी करता येतो. उदाहरणार्थ, पीठ नेहमी फ्रिजच्या मुख्य भागात ठेवावं. फ्रिजच्या दाराजवळ ठेवणं टाळावं, कारण तिथे तापमानात चढ-उतार होत राहतो. पीठावर जर काळसर थर आला असेल किंवा त्याची पोत बदलली असेल तर त्याचा वापर टाळावा. शक्य असल्यास, मळलेलं पीठ २४ तासांच्या आत वापरण्याचा प्रयत्न करावा. एकूणच, फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ विषारी असल्याचा समज चुकीचा असून, योग्य पद्धतीने साठविल्यास ते सुरक्षित, पोषक आणि वापरण्यायोग्य राहते. त्यामुळे या मिथकांपासून दूर राहा आणि थोडं नियोजन करून तुमचं पीठ योग्यरित्या साठवा.
हेही वाचा :
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष