पुढच्या वर्षी म्हणजे २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार का हा प्रश्न सर्वांसमोर आहे. टीममधील दोन दिग्गज खेळाडूंचं 2027 वर्ल्डकपमधील स्थानाबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. सबा करीम यांच्या मते, विराट कोहलीने आपल्या कामगिरी आणि तंदुरुस्तीच्या जोरावर 2027 वर्ल्डकपची दावेदारी जवळपास निश्चित केलीये. (World Cup) मात्र रोहित शर्माला अजूनही सिलेक्टर्सचा पूर्ण विश्वास मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

पीटीआयशी बोलताना सबा करीम म्हणाले की, रोहित शर्माने त्याच्या फिटनेससोबतच मैदानावरील कामगिरीतही सातत्य दाखवणं आवश्यक आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये निवड समिती रोहितच्या फिटनेसवर आणि फलंदाजीतील कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. (World Cup) त्यानंतरच 2027 वर्ल्डकपच्या नियोजनात त्याचा समावेश असेल की नाही याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.दुसरीकडे, विराट कोहलीबाबत बोलताना सबा करीम यांनी त्याचं भरभरून कौतुक केलंय. त्यांनी सांगितलं की, विराटने आपल्या खेळातून तसंच उत्कृष्ट फिटनेसमधून आणि चांगल्या कामगिरीने टीमसाठी स्वतःचं महत्त्व सिद्ध केलंय. त्यामुळे आता त्याला सिलेक्टर्ससमोर काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.
करीम यांच्या मते, सध्या या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. विराट कोहली सातत्याने चांगली कामगिरी करतोय तर रोहित शर्माला पुन्हा एकदा त्याच्या खेळात सातत्य आणण्याचं मोठं आव्हान आहे.दोघांच्या कामगिरीतील फरक आयपीएल 2026 सिझनमध्येही या दोघांच्या कामगिरीतील फरक स्पष्टपणे दिसून आला. विराट कोहलीने आरसीबीकडून खेळताना 675 रन्स केले. (World Cup) यावेळी त्याने टीमला आयपीएल जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याउलट रोहित शर्मासाठी हा सिझन अपेक्षेप्रमाणे झाला नाही. त्याने या सिझनमध्ये केवळ 283 रन्स केले आहेत. विराटच्या कामगिरीबद्दल बोलताना सबा करीम म्हणाले की, काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची त्याची क्षमता हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. विराट सातत्याने त्याच्या खेळात सुधारणा करत असतो. विशेषतः टी-20 क्रिकेटमध्ये त्याने स्ट्राइक रेट वाढवून क्रिकेटच्या गरजेनुसार स्वतःमध्ये बदल केले आहेत.
हेही वाचा :
‘तर थेट कारवाई करू’ महाविद्यालयांना मोठा झटका
भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, VIDEO द्वारे व्यक्त केली नाराजी
“आता रम्मी नाही तर आता तीन पत्ती खेळ सत्ताधारी कलंकित मंत्र्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा ‘आक्रोश’