टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) नेदरलँडचा 3 विकेट आणि 3 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे पाकिस्तानला गुणतालिकेत 2 गुण मिळाले असले, तरी अपेक्षेप्रमाणे नेट रनरेट सुधारता आला नाही. त्यामुळेच पाकिस्तानचा पुढचा प्रवास अधिकच कठीण बनला आहे. सध्या पाकिस्तानचा नेट रनरेट +0.240 इतका असून, एका सामन्यातील पराभवही त्यांना महागात पडू शकतो आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान (Pakistan) भारताविरुद्ध खेळणार की नाही, याबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. पाकिस्तानचा पुढील सामना अमेरिकेविरुद्ध होणार असून, त्या सामन्यातील निकालावर भारताविरुद्धचा सामना खेळायचा की नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बदलावा लागू शकतो, अशी चिन्हं आहेत.

दरम्यान, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने या प्रकरणात (Pakistan) थेट पुढाकार घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ईमेलद्वारे विनंती करत 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने खेळावे, अशी अपील केली आहे. हा सामना झाला नाही, तर श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या गेट मनी, हॉस्पिटॅलिटी विक्री आणि इतर उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. यजमानपद असल्यामुळे स्पर्धेच्या आयोजनावरही त्याचा विपरीत परिणाम होईल, असं श्रीलंकेने स्पष्ट केलं आहे.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी यासाठी थेट पीसीबीचे (Pakistan) चेअरमन मोहसिन नकवी यांच्याशी संपर्क साधला असून, पाकिस्तानकडून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे. रिपोर्टनुसार, मोहसिन नकवी यांनी या विनंतीला मान देत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी सांगितले की, या विषयावर पाकिस्तान सरकारसोबत चर्चा करण्यात येईल आणि लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. हा ईमेल पंतप्रधानांसमोर ठेवण्यात येणार असून, सोमवारपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
भारत–पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे नियोजित असून, या सामन्यासाठी भारतीय संघ कोलंबोत जाणार, याबाबत कोणतीही शंका नाही. मात्र पाकिस्तानने सामना खेळला नाही, तर नियमानुसार भारताला थेट दोन गुण मिळतील. त्यामुळे आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष पाकिस्तानच्या अंतिम निर्णयाकडे लागलं आहे.

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी