फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?

डिजिटल व्यवहारांसाठी मोबाईल वॉलेट आणि यूपीआय ॲप्सचा वापर झपाट्याने वाढत असताना फोनपे ने आपल्या वॉलेट वापरकर्त्यांसाठी नवीन नियम लागू केला आहे. बराच काळ वॉलेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांकडून आता देखभाल शुल्क आकारले जाणार आहे.(implemented) त्यामुळे फोनपे वॉलेट वापरणाऱ्या ग्राहकांनी या बदलाची माहिती जाणून घेणे आवश्यक ठरणार आहे.

निष्क्रिय वॉलेटवर आकारले जाणार शुल्क फोनपेने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, सलग 365 दिवस वॉलेटमधून कोणताही आर्थिक व्यवहार न झाल्यास संबंधित वॉलेट निष्क्रिय मानले जाईल. केवळ ॲप उघडणे, शिल्लक तपासणे किंवा यूपीआयद्वारे व्यवहार करणे याला वॉलेट सक्रिय असल्याचे मानले जाणार नाही. वॉलेट सक्रिय ठेवण्यासाठी वापरकर्त्यांनी वॉलेटमधील शिल्लक वापरून थेट व्यवहार करणे आवश्यक आहे. (implemented) यात पैसे पाठवणे, वॉलेटमधून पेमेंट करणे किंवा उपलब्ध शिल्लक वापरणे यांचा समावेश आहे. कंपनीच्या मते, दीर्घकाळ निष्क्रिय राहिलेल्या खात्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त खर्च येत असल्याने ‘वॉलेट इनॲक्टिव्हिटी मेंटेनन्स फी’ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फोनपेने आपल्या ब्लॉगद्वारे स्पष्ट केले आहे की, निष्क्रिय वॉलेटवर दर तीन महिन्यांनी 100 रुपये, जीएसटीसह, शुल्क आकारले जाईल.

जर वॉलेटमध्ये 100 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक शिल्लक असेल, तर कंपनी थेट 100 रुपये वजा करेल. मात्र, शिल्लक रक्कम 100 रुपयांपेक्षा कमी असल्यास उपलब्ध रक्कमच कापली जाईल आणि वॉलेटमधील शिल्लक शून्यावर येईल. कोणत्याही परिस्थितीत वॉलेटमध्ये नकारात्मक शिल्लक दाखवली जाणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. शुल्क आकारण्यापूर्वी वापरकर्त्यांना नोटिफिकेशन किंवा संदेशाद्वारे आगाऊ सूचना दिली जाईल. त्यानंतरही वॉलेट वापरले गेले नाही, (implemented) तर देखभाल शुल्क लागू होईल. हे शुल्क टाळण्यासाठी वर्षातून किमान एकदा वॉलेटमधून छोटासा व्यवहार करणे पुरेसे आहे. तज्ज्ञांच्या मते, डिजिटल वॉलेट नियमितपणे तपासणे आणि वापरत नसल्यास त्यातील शिल्लक काढून घेणे ही चांगली सवय ठरू शकते. सध्या अनेक डिजिटल वित्तीय कंपन्या निष्क्रिय खात्यांवर शुल्क आकारत असल्याने वापरकर्त्यांनी आपल्या वॉलेटच्या व्यवहारांवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

फुटीचा शाप असलेली शिवसेना!

विधान परिषदेसाठी आज होणार मतदान?

SBI मध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती जाणून अर्ज प्रक्रिया?