कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
अजित दादा पवार हे हयात असताना, आणि आता त्यांचे विमान (unfortunate) अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू आहे. या विषयावरच्या चर्चेला आम्ही पूर्णविराम दिला आहे असे शरद पवार गटाकडून सांगितले जात आहे, तर या विषयावर मीडियासमोर कोणीही बोलायचे नाही असे अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि आमदारांना सांगितले जात आहे, पण तरीही विलीनीकरणाची चर्चा थांबायला तयार नाही. विविध वृत्तवाहिन्यांवर या विषयावर चर्चा होत नाही असा एक दिवस जात नाही. नेहमीप्रमाणे मंगळवारी याच विषयावर चर्चा सुरू होती.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर राज्यासमोरील सर्व समस्या सुटणार आहेत, आणि त्यांचे एकत्रीकरण झाले नाही तर
राज्यावर आकाश कोसळणार आहे. यापैकी काहीही घडणार नाही.

सर्वसामान्य जनतेलाही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल फारसे (unfortunate) काही स्वारस्य नाही. कार्यकर्त्यांची मात्र तशी इच्छा आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगटाचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जानेवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात 2026 च्या पहिल्या आठवड्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण , विलीनीकरण व्हावे अशी अजित दादा पवार यांची इच्छा असल्याचे वक्तव्य केले होते. दिनांक 12 जानेवारी ही तारीखही त्यांनी जाहीर केली होती. त्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनीही त्यावर आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. अजितदादा यांची जी इच्छा आहे तीच आमचीही इच्छा आहे असे शरद पवार यांनी म्हटले होते. दोन्ही गटाकडून या विषयावर चर्चा सुरू होती. पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेतला जाऊ नये असे अजितदादा पवार यांना सुस्पष्ट शब्दात सांगितले होते.दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी (unfortunate) यासंदर्भात एक लेख लिहून अजित दादा पवार यांची विलीनीकरणाबद्दलची इच्छा होती असे त्यात म्हटले होते.अजितदादा पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी त्या लेखावर नाराजी व्यक्त केली होती. दादाची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा होती पण आता तोच या जगात राहिला नाही त्यामुळे आता त्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही. आम्ही या विषयाला पूर्णविराम दिला आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.महायुती मधील एक मंत्री श्री. झिरवळ यांनीही दादांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा होती असे म्हटले होते. पण त्यानंतरत्यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला 50 हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनने रंगेहात पकडले. या घटनेशी श्री झिरवळ यांच्या विलीनीकरण वक्तव्याशी संबंध जोडला जातो आहे. कारण सुनेत्रा पवार यांनी देवगिरी बंगल्यावर अजित दादा गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विलीनीकरण या विषयावर मीडियाशी कोणीही बोलायचे नाही असे आदेशच दिले आहेत.
अजित दादा पवार हे अनेकदा जयंत पाटील यांच्या निवासस्थानी (unfortunate) त्यांना भेटण्यासाठी गेले होते. विलीनीकरण या विषयावर चर्चा करण्यासाठीच ते गेले होते असे म्हणता येईल. तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या भेटीगाठी किती वेळा झाल्या हे स्पष्ट होईल असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. एकूणच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येणे किंवा त्यांचे विलीनीकरण होणे ही काही फार मोठी घटना नाही. आणि तसे घडलेच तर एक पक्षीय संघटना म्हणून लाभ होईल. यापेक्षा काही वेगळे घडणार नाही.दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार होते तेव्हा अशीच चर्चा जोरदार सुरू होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पण त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला तर सोडाच त्या दोघांनाही झाला नाही हे वास्तव आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र आले किंवा नाही याचा महाराष्ट्राचा राजकारणावर फार काही परिणाम होईल असे नाही.कारण आता कोणत्याही निवडणुका नाहीत. असे असले तरी विलीनीकरण विषयक चर्चा आणखी काही काळ अशीच चालू राहील. तिला पूर्णविराम मिळणार नाही.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली