जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा?

राज्यात जूनअखेर पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष जुलै महिन्यातील पावसाकडे लागले आहे. अनेक भागांत पेरणीची कामे सुरू असताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यासाठी महत्त्वाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते,(rains) काही भागांत अतिवृष्टीची शक्यता असून नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

2 ते 8 जुलैदरम्यान जोरदार पावसाचा इशारा पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, 2 जुलै ते 8 जुलै या कालावधीत मुंबई , पुणे आणि उत्तर महाराष्ट्र परिसरात जोरदार ते अतिवृष्टीसदृश पाऊस पडू शकतो. या काळात काही ठिकाणी यापूर्वी नोंद न झालेल्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (rains) त्यामुळे विशेषतः शेतकरी आणि नागरिकांनी या कालावधीत आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.त्यांच्या मते, या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र भागातही चांगला पाऊस होईल. इगतपुरी , नाशिक , त्र्यंबकेश्वर आणि अहिल्यानगर परिसरातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊसही पडू शकतो. तसेच 2 ते 8 जुलैदरम्यान निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रूपांतरित होऊन त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

धरणांमध्ये पाण्याची आवक वाढण्याची शक्यता या पावसामुळे राज्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होईल, असेही पंजाबराव डख यांनी म्हटले आहे. निळवंडे धरण , मुळा धरण, गंगापूर धरण तसेच प्रवरा नदीवरील धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात होणाऱ्या पावसाचा गंगापूर धरणाच्या जलसाठ्यावर सकारात्मक परिणाम होईल, तर नाशिक जिल्ह्यातील लहान धरणांनाही याचा फायदा होऊ शकतो. 8 जुलैपर्यंतचा पाऊस धरणे भरण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. (rains) याशिवाय कोल्हापूर , सांगली , सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील आटपाडी आणि कासेगाव परिसरातही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम राहील, ऑगस्टमध्ये दोन मोठ्या पावसाच्या लाटा येतील आणि त्यानंतर परतीच्या पावसाचाही प्रभाव राज्यात दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!

महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?

Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?