नोकरदारांसाठी मोठी बातमी दुपारनंतर सुट्टी जाहीर, खासगी कंपन्यांना WFH चे आदेश?

महाराष्ट्रात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई आणि उपनगरांसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खासगी कार्यालयांसाठी वर्क फ्रॉम होम आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अर्धा दिवस सुट्टीचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

मुसळधार पावसामुळे राज्यभरात गंभीर परिस्थिती सतत कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक धरणे आणि तलाव तुडुंब भरले असून काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. (Maharashtra) अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून पुणे -मुंबई मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही रेल्वे मार्ग आणि रस्ते बंद झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई आणि उपनगरांमध्येही सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बदलापूर परिसरातील उल्हास नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहू लागल्याने नदीकाठच्या भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने सांगितले असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्येही पाणी साचल्याने रेल्वे रुळांवर पाणी आले आणि काही काळ रेल्वे सेवा मंदावली. (Maharashtra) त्यामुळे कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नागरिकांना विलंब, गर्दी आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. भारतीय हवामान विभाग यांनी मुंबई महानगर क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी करत ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त केला आहे.

वर्क फ्रॉम होम आणि अर्धा दिवस सुट्टीची घोषणा हवामान विभागाच्या रेड अलर्टनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. (Maharashtra) त्यानुसार मुंबईतील सर्व खासगी कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधा द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. खराब हवामानामुळे होणारा अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.यासोबतच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून अधिकृत सूचना आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने सर्वांनी सतर्क राहावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?

पीएफ खातेधारकांसाठी नवीन नियम, पेन्शनबाबतही मोठे बदल?

धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट?