महाराष्ट्रात यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावल्यामुळे अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा(rain) तडाखा बसत आहे. कोकण किनारपट्टीवर विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याशिवाय जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने फळबागा आणि पाणी संरचना यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर वाढलेला असताना, हवामान खात्याच्या अहवालानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. समुद्र किनाऱ्यांवर धोका वाढल्यामुळे मच्छिमार आणि पर्यटकांनी किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येत्या ३० मेपासून पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे.
अमरावती, बुलढाणा, गोंदिया यांसारख्या जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा(rain) इशारा देण्यात आला आहे. या भागात ४० ते ५० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अकोला, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बदनापूर (जालना) येथे २८ मे रोजी ढगफुटी सदृश पावसाचा अनुभव आला. त्यामुळे अनेक फळबागा उद्ध्वस्त झाल्या असून, काही ठिकाणी विहीरी खचल्या आहेत.
जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि आमदार नारायण कुचे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातही सलग पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
हेही वाचा :
60 सेकंदात नियंत्रणात येईल BP, रक्तदाबाच्या रुग्णांनी जाणूनच घ्या
शरद पवारांना दोन नोटिसा! आयोगासमोर उद्या हजर राहणार?
घिबली नंतर, बेबी व्हर्जन व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड, बनवण्याची पद्धत जाणून घ्या