“हम पीछे हटने को तैयार हैं…”, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हादरला

भारताने पाकिस्तानवर(Pakistan) एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.7 मे ला मध्यरात्री ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानी भूमीवर कहर केला. या हल्ल्याचे पडसाद इस्लामाबादपासून रावळपिंडीपर्यंत ऐकू आले. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले झाल्याने पाकिस्तानची झोप उडाली आहे आणि आता परिस्थिती युद्धासारखी झाली आहे.

भारताने ९ दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ९० दहशतवादी ठार झाले. यानंतर, पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याची भीती इतकी वाढली आहे की त्यांचे संरक्षण मंत्री स्वतः पुढे आले आहेत आणि त्यांनी ‘तणाव संपवण्याचे’ आवाहन केले आहे.

जर भारताने तणाव कमी केला तर पाकिस्तानही(Pakistan) तेच करण्यास तयार आहे, असे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी सांगितले. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर लष्करी कारवाई केल्यानंतर काही तासांतच त्यांचे हे वक्तव्य आले.

पाकिस्तानचे ख्वाजा आसिफ म्हणाले, “आम्ही गेल्या दोन आठवड्यांपासून सतत सांगत आहोत की आम्ही कधीही भारतावर हल्ला करणार नाही. पण जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. जर भारताने माघार घेतली तर आम्ही हा तणाव देखील संपवू.”दरम्यान, भारत-पाकिस्तान चर्चेच्या शक्यतेबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की त्यांना अशा कोणत्याही चर्चेची माहिती नाही.

दरम्यान, पाकिस्तानचे(Pakistan) पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्याचे वर्णन “युद्धाची घोषणा” असे केले आणि म्हटले की, “आमच्या सैन्याला शत्रूला कसे प्रत्युत्तर द्यायचे हे माहित आहे. पाकिस्तान या कृत्याला योग्य उत्तर देईल आणि शत्रूला त्याच्या मनसुब्यांमध्ये कधीही यशस्वी होऊ देणार नाही.”

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ज्यामध्ये २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर ही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. भारताने यापूर्वी सिंधू पाणी करार स्थगित करणे, अटारी सीमा बंद करणे आणि पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडणे अशी कठोर पावले उचलली आहेत.

हेही वाचा :

“शेजाऱ्यांनो चहा कसा वाटला?…” ऑपरेशन सिंदूर नंतर, शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला डिवचले?

“देश के गद्दार हैं…, बुरखा घातलेल्या महिलेने पाकिस्तानच्या झेंड्याचे स्टिकर्स काढले, Video Viral

‘पाकिस्ताननं भारतासोबतचे युद्ध जिंकलं, तर मी…’; पाकिस्तानी मौलानाचं वादग्रस्त वक्तव्य

प्रसिद्ध अभिनेत्रीची युद्धविरोधी भूमिका, म्हणाली “हे लज्जास्पद आहे, निष्पाप लोकांवर…”