हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पुण्यातील मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळत नव्हती. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी हेरंब यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना कळवले.

हेरंब करमरकर हे MV GFS Galaxy या सायप्रस ध्वजाखालील कंटेनर जहाजावर थर्ड इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. रविवारी पहाटे जहाज ओमानच्या सागरी हद्दीजवळून हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करत असताना त्यावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. इंजिन रूममध्ये लागली आग; हेरंब बेपत्ता झाले रविवारी पहाटे सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास जहाजावर क्षेपणास्त्र आदळले. या हल्ल्यामुळे जहाजाच्या इंजिन रूममध्ये भीषण आग लागली आणि जहाजाची यंत्रणा पूर्णपणे बंद पडली. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी लाइफबोटच्या मदतीने बाहेर पडण्यास सुरुवात केली. जहाजावर एकूण 24 कर्मचारी होते. (Hormuz) त्यापैकी 11 जण भारतीय होते. ओमानच्या रॉयल नेव्हीने 23 कर्मचाऱ्यांची सुटका केली. मात्र, इंजिन रूमजवळ काम करत असल्याने हेरंब करमरकर बेपत्ता झाले होते.
शेवटचा फोन कुटुंबीयांशीच हल्ल्याच्या अगोदर, रविवारी पहाटे 2.49 वाजता (IST) हेरंब यांनी आपल्या कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क साधला होता. त्यांनी आपण सुरक्षितपणे हॉर्मुझ सामुद्रधुनी पार केल्याचे सांगितले होते. त्या फोननंतर काही मिनिटांतच जहाजावर हल्ला झाला आणि त्यानंतर हेरंब यांच्याशी संपर्क तुटला. हेरंब करमरकर हे पुण्यातील रहिवासी आणि व्यवसायाने मरीन इंजिनिअर होते. ते व्यापारी मालवाहू जहाजांवर थर्ड इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. समुद्रातील प्रवासात ते तीन महिन्यांहून अधिक काळ होते आणि लवकरच ते सुट्टीसाठी भारतात परतणार होते. हेरंब हे पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. (Hormuz) त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि जवळचे नातेवाईक आहेत. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी मरीन इंजिनिअर म्हणून करिअर घडवले होते. ते लवकरच घरी परतणार असल्याने कुटुंबीय त्यांच्या स्वागताची तयारी करत होते.
अमेरिकेची प्रतिक्रिया हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स कडून व्यापारी जहाजावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर अमेरिकेने इराणमधील काही ठिकाणांवर लष्करी कारवाई सुरू केल्याचेही जाहीर केले. अमेरिकेने जहाजावरील एका नागरी कर्मचाऱ्याचा शोध सुरू असल्याचे सांगितले होते. तो कर्मचारी म्हणजे हेरंब करमरकर असल्याचे नंतर स्पष्ट झाले.32 तास माहिती मिळाली नाही; कुटुंबीयांची व्यथा फॉरवर्ड सीमन्स युनियन ऑफ इंडियाने या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हेरंब यांच्या स्थितीबाबत 32 तास कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, त्यामुळे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावात होते, असे संघटनेने म्हटले आहे. संघटनेने भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले असून व्यापारी जहाजांवरील वाढत्या हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे.
भारत सरकारची भूमिका या घटनेनंतर भारत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या उपराजदूतांसह वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना पाचारण करून व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांबाबत तीव्र निषेध नोंदवला. भारताने आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरील हल्ले आणि हिंसाचार तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. (Hormuz) तसेच पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षावर तातडीने संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहनही केले आहे हेरंब करमरकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर पुण्यासह संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जात आहे. समुद्रात काम करणाऱ्या भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा :
इराणची जगाला मोठी धमकी, ज्याची भीती तेच घडले, थेट भारतातही?
सर्दी, खोकल्यावर सोप घरगुती उपाय, रस एकमेव पर्याय, औषधांची गरज नाही?
आषाढी वारीनिमित्त प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय मांसविक्रीवर 15 दिवस पूर्ण बंदी?