ममता बॅनर्जी यांना तिसरा सर्वात मोठा धक्का मतदानाआधीच पोटनिवडणुकीत पराभव होणार काय घडतंय?

रेजीनगर मतदारसंघाच्या अगोदर ममता बॅनर्जी यांनाा नंदीग्राम मतदारसंघात मोठा फटका बसला आहे. बॅनर्जी यांनी या जागेवरून संचिता प्रधान डे यांना उमेदवारी दिली होती. (Mamata Banerjee) परंतु बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. तेथे रेजीनगर आणि नंदिग्राम या विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान होईल. दरम्यान, ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबर धक्का बसला. तृणमूल काँग्रेसचे पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही गोठवण्यात आले. सध्या बॅनर्जी यांच्या पक्षाला नवे नाव देण्यात आले असून निवडणूक चिन्हही बदलले आहे. हा धक्का ताजा असतानाच नंदीग्राम मतदारसंघातून बॅनर्जी यांच्या पक्षाच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली. हा दुसरा धक्का बसेलला असताना आता रेजीनगर मतदारसंघातूनही बॅनर्जी यांची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. (Mamata Banerjee) त्यामुळे बॅनर्जी यांची ही जागादेखील धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

पश्चिम बंगालच्या रेजीनगर मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. शनिवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने रबीउल आलम चौधरी यांना तिकीट दिले आहे. त्यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पक्षाचे नाव बदलले आहे. निवडणूक चिन्हही बदलण्यात आलेय. (Mamata Banerjee) त्यामुळे एवढ्या कमी वेळात मतदारांपर्यंत नवे चिन्ह घेऊन जाणे अशक्य आहे, असे मत चौधरी यांनी व्यक्त केलं होतं. तसंच निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे संकेत दिले होते. परंतु ममता बॅनर्जी यांची भेट झाल्यानंतर ते आता आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करणार असल्याचे सांगितले जात आहे.

रेजीनगर मतदारसंघाच्या अगोदर ममता बॅनर्जी यांनाा नंदीग्राम मतदारसंघात मोठा फटका बसला आहे. बॅनर्जी यांनी या जागेवरून संचिता प्रधान डे यांना उमेदवारी दिली होती. परंतु बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे बॅनर्जजी ऐनवेळी अडचणीत सापडल्या. त्यांना काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा जाहीर करावा लागला. दरम्यान आता नंदीग्राम मतदारसंघात फटका बसलेला असतानाच रेजीनगरात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : 

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात?

‘हुपरी’ प्रकल्पातून आत्मनिर्भरतेचे पाऊल परकीय चलनात बचत?

भारत अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 लोकांना अटक, पोलिसांनी असं का केलं?