महाराष्ट्रात कधी पडणार पाऊस? मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर?

अरबी समुद्रात खोळंबलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट आणि बळीराजाची चिंता दिवसेंदिवस अधिक गडद होत चालली आहे. हवामान विभागाने सुरुवातीला १५ जून आणि (monsoon) त्यानंतर २० जून २०२६ पर्यंत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज दिला होता. मात्र, सद्यस्थिती पाहता मान्सूनची वाटचाल इतकी संथ आहे की, २० जून किंवा थेट २२ जूनपर्यंतही राज्यात मान्सूनचे रीतसर आगमन होण्याची शक्यता कमीच असल्याचा इशारा आता काही हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. हा लांबणारा पाऊस राज्यासाठी एका मोठ्या धोक्याची घंटा मानला जात आहे.

मान्सून एकाच जागी स्थिर हवामान अभ्यासकांच्या मते, अफगाणिस्तानच्या दिशेने येत असलेल्या अत्यंत तीव्र आणि कोरड्या वाऱ्यांनी मान्सूनच्या प्रवाहात मोठा अडथळा निर्माण केला आहे. परिणामी, मान्सून अरबी समुद्रात एकाच ठिकाणी रेंगाळला असून पुढील ३ ते ४ दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.एल निनोचा गंभीर प्रभाव परिस्थिती अधिक बिकट होण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रशांत महासागरात सक्रिय असलेला ‘एल निनो’ हा घटक होय. एल निनोमुळे यंदा केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जगभरातील हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जर हा अडथळा असाच कायम राहिला, तर जून अखेर म्हणजेच २९ जून उजाडला तरीही मान्सून राज्यात पूर्णपणे सक्रिय होणार की नाही, (monsoon) याबाबत शंका निर्माण झाली आहे. जून महिना कोरडा जाण्याच्या भीतीने बळीराजा हवालदिल

शेतीच्या पाण्याची गंभीर समस्या जून महिन्याचा पंधरवडा संपला असून अर्ध्याहून अधिक महिना सरत आला आहे. शेतकऱ्यांनी नांगरणी, मशागत करून शेते पेरणीसाठी तयार ठेवली आहेत. बी-बियाणे आणि खतांची खरेदी करून शेतकरी चातकासारखी वरुणराजाची वाट पाहत आहेत. मात्र, कडक उन्हाळा आणि वाढत्या उष्णतेमुळे शेतकरी राजा कमालीचा चिंतेत आहे. जर संपूर्ण जून महिना कोरडा गेला, तर पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर रूप धारण करेल.

पेरण्या लांबल्याने दुबार पेरणीचे सावट कृषी विभाग आणि राज्य प्रशासनाने आधीच स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जोपर्यंत राज्यात मान्सून पूर्णपणे दाखल होत नाही आणि पेरणीयोग्य दमदार पाऊस पडत नाही, (monsoon) तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सध्याच्या कोरड्या किंवा अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास बियाणे जळून खाक होईल आणि शेतकऱ्यांवर ‘दुबार पेरणीचे’ आर्थिक संकट कोसळेल. देशातील इतर काही राज्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असला, तरी महाराष्ट्रात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आता सर्वांचे डोळे अरबी समुद्रातील ढगांच्या हालचालींवर आणि हवामान खात्याच्या पुढील इशाऱ्यांवर खिळले आहेत.

हेही वाचा :

पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग

शालेय बस-व्हॅन शुल्कात तब्बल 15 टक्क्यांनी वाढ?

पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?