घटनास्थळी एक नाही दोन चमत्कार; आगीच्या गोळ्यातही ‘भगवद्गीता’ सुरक्षित

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. परंतु, अपघात घडल्यानंतर या ठिकाणी एक नव्हे तर दोन चमत्कार घडल्याचे आता समोर आले आहे. या दुर्दैवी अपघातात २६५ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर विमानातील 11A क्रमांकाच्या सीटवर बसलेले रमेश विश्वास कुमार हे चमत्कारिकरित्या (miracles )बचावले.

पण त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अपघाताच्या ढिगाऱ्यात एका प्रवाशाची भगवद्गीता अगदी सुस्थितीत सापडली आहे. भीषण आगीतही भगवद्गीतेच्या एकाही पानाला कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. त्यामुळे हे दोन्ही चमत्कार विज्ञान आणि तर्काच्या मर्यादेपलीकडे श्रद्धा आणि चमत्काराचे(miracles ) उदाहरण बनल्या आहेत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावार मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

अहमदाबाद विमानतळावरून काल (दि.12) उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचे AI 171 विमान मेघनीनगर येथील निवासी भागातील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर आदळले. विमान कोसळले तेव्हा सर्वत्र आरडाओरडा, ज्वाला आणि ढिगाऱ्यांचे ढीग होते. अशा परिस्थितीत विश्वास कुमार यांचे सुखरूप वाचणे हे सर्वांसाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हते. विमानाचा धावपट्टीवर वेग वाढवू लागताच, काहीतरी विचित्र घडल्यासारखे वाटले. अचानक ५-१० सेकंदांसाठी सर्व काही थांबले. शांतता, नंतर अचानक हिरवे आणि पांढरे दिवे चालू झाल्याचे उलगडा विश्वास कुमार यांनी घटनाक्रम सांगतना केला.

विश्वास यांनी सांगितले की, विमानाचा ज्या भागात माझी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागाशी आदळला असावा(miracles ). वरच्या भागात आग लागली होती, तेथे बरेच लोक अडकले होते. मात्र, मी सीटसह बाहेर फकलो गेलो. अपघातानंतर आपतकालीन दरवाजा तुटलेला होता तेथून मी समोर दिसलेल्या रिकाम्या जागेतून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूला एक भिंत होती, त्यामुळे कदाचित तेथून कोणीही बाहेर येऊ शकले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला असावा.

 

भीषण अपघातानंतर आता घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, यातीलच एका पथकाला विमानाचा ढिगारा साफ करताना एक पुस्तक दिसले. एकीकडे सगळीकडे काळी राख पसरलेली असताना सापडलेल्या या पुस्तकातील एकाही पानाला साधा धक्का सुद्धा लागलेला नव्हता. सापडलेले हे पुस्तक दुसरे तिसरे काही नव्हते तर, होती भगवद्गीता. ज्यावेळी हे पुस्तक हातात घेतले त्यावेळी ते पूर्णपणे जळालेले असेल असे वाटले होते.

परंतु, जेव्हा हे पुस्तक जवळ जावून हातात घेतले त्यावेळी या पुस्तकातील काही पानांवर फक्त थोडीशी काजळी असल्याचे दिसून आले. त्यानंतर आता घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी आणि मदतकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या घटनेला श्रद्धेशी जोडत हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. इतक्या मोठ्या अपघातात जिथे सर्व काही जळून गेले, तिथे भगवद्गीता अशा प्रकारे सुरक्षित सापडणे हे चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे म्हटले आहे. एकीकडे तपास यंत्रणा अपघातामागील तांत्रिक कारणांचा तपास करण्यात व्यस्त असताना, दुसरीकडे विश्वासकुमार यांचे वाचणे आणि आगीच्या आगडोंबात भगवद्गीता आहे तशीच राहणे या दोन्ही घटना एक दैवी चमत्कार मानत आहेत.

हेही वाचा :