भारताने पाकिस्तानवर(Pakistan) जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्या रडार सिस्टिमला निष्क्रिय केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेत्रणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्याला उत्तर देताना भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या 12 शहरांवर पन्नासहून अधिक ड्रोन हल्ले केले असून रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यात पाकव्याप्त काश्मीरमधील 5 आणि पाकिस्तानातील 4 ठिकाणांचा समावेश होता. या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.
पाकिस्तानच्या(Pakistan) हल्ल्याच प्रत्युत्तर म्हणून भारताने मंगळवारी मध्यरात्री ड्रोनद्वारे 50 पेक्षा जास्त तडाखेबाज हल्ले केले. पाकिस्तानच्या 12 प्रमुख शहरांमध्ये हे हल्ले झाले असून, हे सर्व हल्ले अचूक लक्ष्यावर केंद्रित होते. भारताने या कारवाईची जबाबदारीही उघडपणे स्वीकारली आहे.
भारतीय संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, या कारवाईत पाकिस्तानमधील हवाई संरक्षण रडार आणि संबंधित प्रणालींना लक्ष्य करून त्यांना निष्क्रिय करण्यात आले आहे. भारताने ही कारवाई पूर्णपणे लष्करी नियोजनाच्या अधीन राहून केली असून, पाकिस्तानच्या भविष्यातील हल्ल्यांवर आघात केला आहे.

भारताने ही कारवाई करत पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे – दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्या कोणत्याही देशावर कारवाई करण्यात भारत मागे हटणार नाही. संरक्षण विभागाने देशांतर्गत सुरक्षेसाठी उत्तर आणि पश्चिम लष्करी तळांवर सतत नजर ठेवली आहे.
या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, सीमारेषेवर सुरक्षा व्यवस्था आणखी बळकट करण्यात आली आहे. भारताच्या या तडाखेबाज उत्तरामुळे जागतिक स्तरावरही राजनैतिक हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’! ‘वामा’ चित्रपटातील आयटम साँग प्रदर्शित
भारताचे एकमेव शहर, जेथे एकही कार नाही ! तरीही पर्यटकांचे आवडते ठिकाण
एकनाथ शिंदेंनी टायमिंग साधलं! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘दे धक्का’