कर्नाटकमधील बळ्ळारी जिल्ह्यातील कुरुगोडू तालुक्यातील बारदानहळ्ळी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे(wife). कौटुंबिक कलहाला कंटाळून एका आईने आपल्या तीन चिमुरड्यांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांमध्ये आई सिद्धम्मा (वय ३०) व तिची तीन मुले – अभिग्ना (८), अवनी (६) आणि आर्या (४) यांचा समावेश आहे. सिद्धव्वा मूळची महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हसूरचंपू गावची असून, माहेर बेळगाव जिल्ह्यातील होसूर येथे आहे. तिचे कुमार (वय ३२) याच्यासोबत सुमारे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
सिद्धव्वा व तिचे कुटुंब मेंढपाळ व्यवसाय करत असून, दरवर्षी उन्हाळ्यात बळ्ळारी जिल्ह्यातील बारदानहळ्ळी येथे येऊन काही महिने मुक्काम करत असे. यंदाही ते राघवेंद्र यांच्या शेतजमिनीवर मेंढ्या चारत होते.
सोमवारी सिद्धव्वा(wife) आणि पती कुमार यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी सिद्धव्वा मुलांना घेऊन मेंढ्या चारण्याच्या बहाण्याने बाहेर गेली. मात्र, त्या चौघांनी मिळून शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केल्याचा संशय आहे.

मेंढ्या गोठ्यात न परतल्यामुळे कुमारला संशय आला. तो त्यांचा शोध घेण्यासाठी गेला असता शेततळ्याजवळ मेंढ्या उभ्या आणि पत्नी-मुलांचा कुठेही पत्ता नव्हता. शेवटी तळ्यात पाहिल्यावर सगळं वास्तव समोर आलं.
या घटनेने बारदानहळ्ळी परिसरात शोककळा पसरली आहे. धक्क्यात गेलेल्या कुमारने तातडीने नातेवाईकांना माहिती दिली. सिद्धव्वाच्या भावाच्या तक्रारीवरून कुरुगोडू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
महाविद्यालयावरून उडी मारली, तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मुलीने टोकाचं पाऊल का उचललं?
विमान अपघाताचं रहस्य ब्लॅक बॉक्स उलगडणार?; प्रयोगशाळेतून महत्त्वाची माहिती समोर