कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ऑपरेशन सिंदूर च्या दणक्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने उसने अवसान आणून भारताच्या काही शहरांवर ड्रोन च्या माध्यमातून हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर भारताने जोरदार प्रतिहल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटले. युद्ध(war) सुरू झाल्यानंतर अवघ्या 48 तासात पाकिस्तान घायकुतीला आला आहे. पाकिस्तानची चायना मेड आकाश सुरक्षा प्रणाली फुसकी निघाल्याने आणि भारतीय बनावटीची अवकाश सुरक्षा प्रणाली मजबूत असल्याचे सिद्ध झाल्याने पाकिस्तान मानसिकदृष्ट्या कोसळला आहे.

अंतर्गत कलह, बलुचिस्तानच्या लिबरेशन आर्मी कडून सुरू झालेले हल्ले, आर्थिक दिवाळखोरी, लष्कर प्रमुखांनी राबवलेला व्यक्तिगत अजेंडा, सामान्य जनतेला नको असलेले युद्ध(war), अर्थ सहाय्यासाठी अनेक देशांनी फिरवलेली पाठ, या एकूण प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानला येत्या काही दिवसातच भारतासमोर गुडघे एकावे लागतील. तथापि भारताकडे पुन्हा वाकड्या नजरेने बघण्यापूर्वी हजार वेळा विचार करावा लागेल इतकी दहशत पाकिस्तानला बसवल्याशिवाय भारत आता मागे हटणार नाही असे सध्याचे चित्र आहे.
पाक व्यक्त काश्मीर आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळावर भारताने हल्ले केले. आम्हाला त्रास देणाऱ्या दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे आणि तो आम्ही बजावलेला आहे असे भारताने प्रमुख देशांशी संपर्क साधून स्पष्ट केले आहे. आणि त्याला कोणत्याही देशाने हरकत घेतलेली नाही. कारण अनेक देशांना दहशतवादाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच भारताच्या ऑपरेशन सिंदूर ला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे, समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पटलावर भारताचे महत्त्वाचे स्थान निर्माण केल्याचाही भारताला फायदा होताना दिसतो आहे.
चायना मेड उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत गुणात्मक स्थान नाही. चायना मेड वस्तू ही फार काळ टिकत नाही, किंवा त्याची कोणीही गॅरंटी किंवा वॉरंटी देत नाही. आता तर चीनची लष्करी उत्पादने ही निकृष्ट दर्जाची असतात हे या युद्धात सिद्ध(war) झाले आहे. पाकिस्तानने चीनकडून आकाश सुरक्षा प्रणाली विकत घेतली आहे.

पण तिचा भारताबरोबर च्या युद्धात काडीमात्र उपयोग झालेला नाही. ही प्रणाली विकत घेऊन पाकची फसगत झाली आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तान या युद्धात तोंडावर पडला आहे.”ऐन लढाईच्या वेळी तोफेत पाणी”अशी एक मराठी म्हण आहे आणि ती पाकिस्तानसाठी तंतोतंत लागू पडली आहे. पाकच्या नापाक लष्कराकडे युद्ध लढण्याचे कौशल्य नाही आणि म्हणूनच त्यांची पाच लढाऊ विमाने भारताने जमिनीवर वळवली.
1971 च्या युद्धानंतर भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराची येथील बंदरावर दहा पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे डागून त्याची प्रचंड हानी केली आहे. पाकिस्तानची राजधानी असलेले इस्लामाबाद ही भारतीय हवाई दलाच्या नजरेतून सुटलेले नाही.
पाकिस्तानचे पाणी अडवण्याची कोणतीही भारताची कृती ही युद्ध(war) म्हणून समजली जाईल. अशी वल्गना करणारे पाकचे पंतप्रधान शहाबाज शरीफ युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या 48 तासात जगातील अनेक देशांकडे भीक मागताना दिसू लागले आहेत. पाकिस्तानला अर्थसहाय्य केले तर ते जनतेच्या विकासासाठी खर्च केले जाणार नाही. दहशतवाद्यांना पोसण्यासाठी
त्याचा उपयोग केला जाईल हे आता सर्वांनाच माहित पडल्यामुळे पाकिस्तानला भीक देण्यासाठी सुद्धा कोणी दारात उभे करून देण्यास तयार नाही.
गेल्या 48 तासात भारताने पाकिस्तान चे कंबरडे मोडले आहे. वित्त आणि जीवित हानी मोठ्या प्रमाणावर केली आहे. आणि त्यासाठी अतिशय पद्धतशीरपणे नियोजन केले गेले होते. लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांना पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्याचे मुक्त स्वातंत्र्य देण्यात आल्यानंतर भारतीय लष्कराने जमीन, समुद्र आणि आकाश या तिन्ही पातळीवर एकाच वेळी हल्ले करण्यासाठी व्यूहरचना केली होती. त्याला कौशल्याची जोड दिली होती. त्याआधी काही प्रमुख राष्ट्र प्रमुखांशी संवाद साधून आम्ही लष्करी कारवाई का करणार आहोत याची कल्पना दिली होती.
त्याचबरोबर केंद्र शासनाने देशातील सर्वच राजकीय पक्षांना विश्वासात घेतले होते. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आम्ही या बिकट प्रसंगी सरकारच्या पाठीमागे ठाम उभे आहोत. सरकार जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका घेतली होती. पहेलगाम दहशत कांडानंतर भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दंगे उसळतील, अराजक माजेल हे दहशतवाद्यांचे तसेच पाकिस्तानचे मनसुबे भारतातील सर्वधर्मीयांनी फोल ठरवले. संकटाच्या वेळी आम्ही आमच्यातील मतभेद दूर ठेवून एक आहोत असा एक संदेश भारतीय जनतेने संपूर्ण जगाला या निमित्ताने दिला आहे.
युद्धसदृश्य स्थितीमध्ये जेव्हा असे एकीचे दर्शन घडते तेव्हा लष्कराचे मनोधर्य कितीतरी पटीने वाढते. युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातील काही राजकारणी, काही पत्रकार, एक दोन वृत्तपत्रे, काही तथाकथित विचारवंत यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल सेवानिवृत्त कर्नल हेमंत महाजन यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या मंडळींची भूमिका देशाच्या हिताची आहे असे कोणीही म्हणणार नाही. असे हेमंत महाजन यांनी युद्धविषयक परिस्थितीचे एका वृत्तवाहिनीवर विश्लेषण करताना म्हटले आहे. त्यांनी व्यक्त केलेली नाराजी अनाठायी आहे असे म्हणता येणार नाही.
महाराष्ट्रातील सर्वच वृत्तवाहिन्यांवर सातत्याने दिसणाऱ्या, कोणत्याही विषयावर बोलणाऱ्या 24 तास राजकीय नेत्याच्या भूमिकेत असणाऱ्या एका कार्यकारी संपादकांनी सत्ताधाऱ्यांच्याकडून युद्धाचा उत्सव केला जात असल्याची टीका केली आहे. ऑपरेशन सिंदूर सक्सेस झाल्यानंतर देशभरात फटाके फोडून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. त्याला ते सरकार पुरस्कृत उत्सव म्हणत आहेत.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी भारतावर हल्ले करून युद्धाला तोंड फोडले आहे, त्यामुळे दहशतवादाला युद्ध हे उत्तर नाही असे म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना युद्ध कोणी सुरू केले हे सांगण्याची आवश्यकता नाही. युद्ध सुरू असताना आपण काय बोलतो आहोत याचा विचार संबंधितांनी केला पाहिजे किंबहुना लष्कराचे मनोबल खच्ची होईल असे बोलू नये इतके भान संबंधितांनी ठेवले पाहिजे.
हेही वाचा :
हातात पाण्याची बाटली अन् पाणी-पाणी करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
दोन पक्षातील फुट भाजपच्या पथ्यावर पडणार; महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता
मैत्रिणीनेच केला घात! ड्रग्ज देऊन मित्रांच्या हवाली केले, महिनाभर सामूहिक बलात्कार