आळंदी देवस्थानचे विश्वस्त निरंजन नाथ यांचं गैरवर्तन; भाविकांकडून कारवाईची मागणी

सध्या वारीचा उत्सव सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. वारकरी पुण्यातून वारीसोबत पंढरपुरकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, पुण्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आळंदी(Alandi) देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्या वर्तणुकीमुळे वाद निर्माण झाला आहे. या नाथ यांनी वारकरी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलीस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा आरोप केला जात आहे. तसा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ही घटना पालखी सोहळ्यासारख्या पवित्र वातावरणात घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. निरंजन नाथ यांनी मंदिर(Alandi) परिसरात काही वारकरी व पत्रकारांशी उद्धटपणे संवाद साधल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. इतकंच नव्हे, तर पोलीस कर्मचाऱ्यांशीही त्यांनी अरेरावीने वागणूक दिल्याचा आरोप आहे. त्या वेळी मंदिरात मोठी गर्दी होती आणि सर्वच भाविक शांततेने दर्शनासाठी रांगेत उभे होते, असंही सांगितलं जात आहे.

नाथ यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काही वारकरी आणि मीडिया प्रतिनिधींशी उद्धटपणे संवाद साधला, असं बोललं जात आहे. या घटनेची माहिती देताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, निरंजन नाथ यांनी पोलिसांशी देखील अरेरावीने वागले. मंदिरात मोठी गर्दी होती. परंपरेनुसार वारकरी आणि मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अशा परिस्थितीत निरंजन नाथ यांच्याकडून गैरवर्तन झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

एका वारकऱ्याने या घटनेवर एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हटले, जेव्हा देवाच्या सेवकांना स्वतःला देवाचा मालक असल्याचा भ्रम निर्माण होतो, तेव्हा ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ उमगतो का?”(Alandi). याचा अर्थ, जेव्हा देवाची सेवा करणारे स्वतःलाच मालक समजायला लागतात, तेव्हा त्यांना खऱ्या ज्ञानाचा अर्थ कळतो का, असा प्रश्न आहे. या घटनेनंतर वारकरी समुदायाने मंदिर प्रशासनाकडे या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे.

मंदिर प्रशासनाने अद्याप या प्रकरणावर कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. भाविक आणि वारकरी वर्गातून मात्र ही घटना दुर्दैवी आणि अपमानास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे. वारकरी संप्रदायातील ही निष्ठा आणि भावनेची परंपरा कायम राहावी, यासाठी मंदिर प्रशासनाने त्वरीत पावले उचलावीत, अशी मागणीही वारकरी आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे.

हेही वाचा :

“माझ्या मुलाचाही अतोनात छळ केलाय!” – रवींद्र रणभिसे यांचा श्रध्दा अकॅडमीवर गंभीर आरोप

स्मशानातले अघोरी प्रकार काल ,आज आणि उद्या सुद्धा

निवडणूक प्रक्रियेचे सीसीटीव्ही फुटेज ४५ दिवसांत नष्ट करणार; आयोगाचा मोठा निर्णय