पुणे: यंदाचा एप्रिल महिना गेल्या दहा वर्षातील ‘हाॅट’(hottest) ठरला अाहे. या एप्रिलमधील सर्वाधिक दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक हाेते. गेल्या दहा वर्षांत २०१६मध्ये ११, २०१९मध्ये १२ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक होते.

तापमानाचा पारा यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच वाढू लागला हाेता. कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. तसेच, शहरात तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. कोरडे हवामान, उत्तरेकडून येणारे उष्ण वारे अशा कारणांमुळे तापमानात वाढ होत राहिली आहे.
हवामान विभागाच्या गेल्या दहा वर्षांतील एप्रिलमधील तापमानाचा(hottest) आढावा घेतला असता, शिवाजीनगर येथे २०१६मध्ये ११ दिवस, २०१९मध्ये १२ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिले होते. तर यंदा नवा विक्रम नोंदवला जाऊन गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक १३ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिले आहे. २०१५मध्ये एक, २०१६मध्ये ११, २०१७मध्ये सहा, २०१८मध्ये दोन, २०१९मध्ये १२, २०२०मध्ये एक, २०२२मध्ये सात, २०२३मध्ये एक, २०२४मध्ये सात दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक नोंदवले गेले होते. तर २०२१मध्ये एकदाही तापमानाने चाळीशी गाठली नाही.
यंदा एप्रिलमध्ये १३ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहण्यामागे ठोस असे कारण नाही. तापमानात चढ-उतार होत राहतात. पुढील तीन ते चार दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४ मेच्या सुमारास तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकेल. हवेतील आर्द्रता वाढण्याची, तसेच हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचे सानप यांनी सांगितले.

यंदाच्या हंगामात उन्हाचा पारा चांगलाच वर जात आहे. सध्या सरासरी 43 अंशांपर्यंत पाऱ्याने मजल मारली आहे. गेल्या 2-3 दिवसांमध्ये तर उन्हाचा कहरच पाहायला मिळत आहे. मंगळवारी (दि. 29) सकाळपासून उन्हसावलीचा खेळ सुरू होता. तरीही वातावरणात कमालीची उष्णता होती.
सकाळपासूनच सूर्याचा प्रकोप पाहिला मिळत आहे. आकाशात अधूनमधून ढगांची गर्दीही असल्याने सावलीनेही किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तळपत्या उन्हापुढे हा दिलासा फोल ठरत होता. दुपारी सर्वोच्च तापमान अनुभवण्यास मिळत आहे. दुपारी 4.30 वाजेपर्यंत उन्ह कायम राहते. तर रात्री 9 वाजेपर्यंत उष्ण वाऱ्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यंदा मार्चमध्ये तापमानवाढीला सुरुवात होऊन एप्रिलमध्ये पाऱ्याने उच्चांक गाठायला सुरुवात केली. एप्रिलचे 21 दिवस तापमान चांगलेच वर राहिले.
हेही वाचा :
‘सॉरी! माझं चुकलं, जाऊ द्या मला’, मद्यधुंद महिलेने मुलीला चिरडलं
रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! आजपासून ‘या’ नागरिकांचं स्वस्त धान्य बंद होणार
इचलकरंजीत बिअर न मिळाल्याने गोंधळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल