भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, राजस्थान राज्यातील तीन प्रमुख सीमावर्ती शहरांमध्ये प्रशासनाकडून हाय अलर्ट(High alert) जारी करण्यात आला आहे. बाडमेर, श्रीगंगानगर आणि जोधपूर या शहरांमधील नागरिकांना तातडीने आपापल्या घरी परतण्याचे आणि घरातच थांबण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.

बाडमेरच्या जिल्हाधिकारी टिना डाबी यांनी सांगितले की, शहरातील सर्व नागरिकांना तात्काळ घरी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात संपूर्ण बाजारपेठ आणि शहरातील सर्व कामकाज पूर्णपणे बंद राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राजस्थानच्या काही सीमावर्ती भागांमध्ये रेड अलर्ट(High alert) जारी करण्यात आला होता. त्यावेळी पाकिस्तानची अनेक ड्रोन विमाने निवासी भागात घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले होते. तथापि, भारतीय सैन्याने अत्यंत सतर्कतेने हे सर्व ड्रोन हल्ले हवेतच नष्ट केले. या भागांमध्ये सुमारे १२ तासांसाठी ब्लॅकआऊट देखील करण्यात आला होता.

श्रीगंगानगर जिल्ह्यात प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन सदृश परिस्थिती निर्माण केली असून, लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. जोधपूरमध्येही जिल्हा प्रशासनाने लोकांना तातडीने घरी जाण्याचे निर्देश दिले आहेत. या काळात संपूर्ण शहर बंद राहणार असून, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, जैसलमेर जिल्ह्यातही सुरक्षेच्या कारणास्तव बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक ठिकाणी लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे सीमावर्ती भागातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा :
“आम्हाला माधुरी दीक्षित द्या, आम्ही निघून जाऊ”; पाकिस्तानी सैनिकांनी केलेली विचित्र मागणी
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! कधी जाहीर होणार निकाल?