भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतला मोठा निर्णय, आता जर दहशतवादी हल्ला झाला तर…

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(terrorist attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. गेल्या सलग दोन रात्री पाकिस्तानने ड्रोनने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारताने हवेतच हाणून पाडण्यात आला. याचपार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी सूत्रांनुसार आता जर भारताविरुद्ध दहशतवादी हल्ला झाला तर तो युद्ध मानला जाईल आणि त्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिले जाईल.

सरकारच्या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की, भारत यापुढे पाकिस्तानकडून होणारे दहशतवादी हल्ले(terrorist attack) सहन करणार नाही. जर पाकिस्तानने अजूनही दहशतवादी हल्ले थांबवले नाहीत तर भारत ते युद्ध मानेल आणि त्यावर कडक कारवाई करेल.

२२ एप्रिल रोजी, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची आघाडी संघटना टीआरएफने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला. यामध्ये २६ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले. यामध्ये, भारतीय पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या, ज्यामुळे देशभरात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला.

पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला(terrorist attack) प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि रात्री उशिरा पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा सदस्यांचाही मृत्यू झाला. याशिवाय इतर अनेक मोठे दहशतवादीही मारले गेले. भारताच्या कारवाईने अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री जम्मूसह अनेक शहरांवर ४०० तुर्की ड्रोनने हल्ला केला.

दरम्यान भारताचे फारसे नुकसान झाले नाही आणि हवाई संरक्षण यंत्रणेने आकाशातच हे हल्ले उधळून लावले, अशी माहिती मिळत आहे. यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा पाकिस्तानने भारतातील २६ शहरांवर ड्रोन हल्ले केले. हे देखील उधळून लावण्यात आले. पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. काल रात्री भारतानेही सहा पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा :

भारतीय महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात? फायटर जेट क्रॅश?

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! कधी जाहीर होणार निकाल?

‘या’ ३ शहरांमध्ये हाय अलर्ट, नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन