रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! आजपासून ‘या’ नागरिकांचं स्वस्त धान्य बंद होणार

राज्यातील कोट्यवधी रेशनकार्ड(ration card) धारकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे 2025 पासून ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना स्वस्त दरात धान्य मिळणार नाही. सार्वजनिक वितरण प्रणालीतील सुविधा बंद होणार असल्यामुळे लाभार्थ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ई-केवायसीसाठी सरकारने 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ दिली होती, मात्र अद्याप अनेक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता अशांची रेशन कार्डे(ration card) तात्पुरती निष्क्रिय करण्यात येणार आहेत.

डुप्लिकेट आणि अपात्र लाभार्थ्यांचा वाढता गैरवापर लक्षात घेता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तांदूळ, गहू, डाळी, साखर यांसारखे स्वस्त दरातील जीवनावश्यक अन्नधान्य पुरवठा फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा, यासाठी ही कारवाई.

ई-केवायसी करण्याच्या दोन पद्धती :

  1. ऑफलाइन पद्धत (FPS दुकानातून):

रेशन आणि आधार कार्ड घेऊन नजीकच्या राष्ट्रपुरवठा दुकानात जावे.
स्थानिक पुरवठादार बायोमेट्रिक प्रणालीने प्रक्रिया पूर्ण करतो.

  1. ऑनलाइन पद्धत (घरबसल्या मोबाईलवर):

‘Aadhaar FaceRD’ हे अ‍ॅप डाउनलोड करा.
आधार क्रमांक व पत्ता टाका, ओटीपी भरा.
“Face-e-KYC” पर्याय निवडा, चेहरा स्कॅन करा व सबमिट करा.

हेही वाचा :

आता देशवासियांचे लक्ष लष्कराच्या प्रत्यक्ष कृतीकडे

पुढच्या वर्षीही IPL खेळणार? CSK च्या कर्णधाराचे हसत-हसत उत्तर

देशात लागू होणार हे ५ मोठे बदल तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम