बंगळुरूमध्ये प्रेमसंबंधांना विरोध करत एका शेतकरी वडिलांनी स्वतःच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. (missing) हत्या केल्यानंतर मृतदेह जमिनीत गाडून आरोपीने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा झाला.

प्रेमविवाहाला विरोध करत वडिलांकडून मुलीची हत्या हत्या केल्यानंतर मृतदेह जमिनीत गाडून बेपत्ता असल्याचा बनाव पोलिस चौकशीत आरोपी वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली कर्नाटक राज्यातून एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या बाप लेकीच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केलाय. बापानेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. बापाने आधी हत्या केली त्यानंतर मुलीला जमिनीत गाडले. (missing) त्यानंतर तिथून फरार झाला. मात्र बापानेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या का केली जाणून घ्या.
घडलेली घटना बंगळुरू येथील आहे. आरोपी बापाचे नाव तीम्मरायप्पाला (४८) असे आहे. तर मृत मुलीचे नाव मेघना असे आहे. आरोपी वडील हा शेतकरी आहे. मेघनाचे एका मुलावर प्रचंड प्रेम होते. त्याची कबुली देखील आई-वडिलांना दिली होती. मेघनाचा प्रियकर हा तिच्या आईच्या माहेरच्या नात्यातला होता. मेघ मला त्याच्यासोबतच लग्न करायचे होते यामुळे आरोपी वडील हा संतापला.
16 एप्रिल रोजी आरोपीने मेघनाला त्याच्या शेतावर कामासाठी बोलावले. तिथे त्याने आपल्या मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली. पट्ट्या केल्यानंतर तिला विहिरीत फेकून दिले आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार त्याने दाखल केली. (missing) त्यानंतर मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत आरोपीने मुलीचा मृतदेह जमिनीत गाडला. काही दिवसांनी त्याने आपल्या घरातून देखील पड काढला. बरेच दिवस तो परत आला नाही म्हणून त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याचा देखील तपास करायला सुरुवात केली. या तपासा दरम्यान पोलिसांनी 15 मे रोजी आरोपीला एका गावातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा
जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात
ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?