परीक्षेत नापास, मोबाईलचं व्यसन अन् नैराश्य 11 एक्सपायरी गोळ्या खाऊन 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणाने ११ एक्सपायरी गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांनी त्याला बुधवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हादरून गेला आहे. घडलेली घटना भगलपूरमध्ये घडली.

कृष कुमार (वय २०) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. कृषने इंटरमिजिएटच्या विज्ञान या शाखेची निवड केली होती. मात्र नापास झाल्याने तो निराश झाला होता. त्याच्या वडिलांनी त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला होता. कृषला मोबाईल फोनचं अधिक व्यसन लागलं होतं, तो अधिककरून त्यात गुंतला. (shocking) त्याचे कुटुंबीय त्याला रागावू लागले होते. त्याच्या वडिलांनी ओरडले आणि त्याला अभ्यास करण्यास सांगितले. यामुळे त्याने घरात ठेवलेल्या ११ एक्सपायरी गोळ्या खाल्ल्या.

कृषने ११ गोळ्या खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्याला अमरापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना भागलपूरला पाठवले. परंतु डॉक्टरांनी ऑक्सिजनच्या कमतरतेचे कारण सांगत रुग्णाकडे लक्ष दिलं नाही. वडिलांचं असे म्हणणं आहे की, विद्यार्थ्याला वेळेवर उपचार मिळाले असते तर नक्कीच त्याचा जीव वाचला असता.कृषने इंटरमिजिएटच्या विज्ञान या शाखेची निवड केली होती, त्यात नापास झालेल्या भागलपूर मनाली येथील एका कोचिंग इन्स्टिस्ट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. तिथली फी अधिक होती, त्याने पुन्हा परीक्षा दिली, त्याने मन लावून अभ्यास करत चांगले गुण मिळवावेत असं, (shocking) त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं होतं. मृत कृष कुमार हा दोन भावांमध्ये मोठा मुलगा होता. या घटनेने खळबळ उडाली आहे.

बिहार येथून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पोटच्या 16 वर्षीय मुलीचे लग्न आपल्या बॉयफ्रेंडसोबतच लावून दिले. जेव्हा मुलीला याबाब समजले तेव्हा घरात वाद होत होते. या सततच्या वादाला कंटाळून महिलेने आणि जावयाने मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बिहारच्या अररिया मध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये बँक खाते करा चेक?

जल व्यवस्थापनाचे तीन तेरा पाच दशकांनंतर पाणीबाणी!

स्लोव्हाकियाशी भागीदारी वाढवणार : पंतप्रधान मोदी