अभिनेता अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘देवखेळ’ ही वेब सीरिज पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकली आहे. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये कोकणातील अत्यंत श्रद्धेय दैवत असलेल्या ‘शंकासूर’ याचे चुकीचे आणि अपमानास्पद चित्रण केल्याचा आरोप होत आहे. हा वाद आता थेट विधानसभेत पोहोचला असून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याप्रकरणी पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

आमदार भास्कर जाधव यांची बंदीची मागणी; काय आहे नेमका आक्षेप गुन्हेगार म्हणून चित्रण (series) या वेब सीरिजमध्ये कोकणातील शिमगोत्सवाची परंपरा असलेल्या आणि श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या शंकासूराला चक्क लोकांची हत्या करणारा गुन्हेगार म्हणून दाखवण्यात आले आहे.भावना दुखावल्याचा आरोप: शंकासूर हा असूर (राक्षस) असला तरी कोकणात त्याची ‘देवरुपात’ पूजा केली जाते. पाप आणि अन्याय करणाऱ्यांना तो शिक्षा देतो, अशी तिथली लोकमान्यता आहे. मात्र, सीरिजमध्ये या परंपरेचे विद्रुपीकरण केल्याचा आक्षेप घेत आमदार भास्कर जाधव यांनी या वेब सीरिजवर थेट बंदी घालण्याची मागणी केली आहे.
“श्रद्धास्थानांचा विपर्यास खपवून घेणार नाही” – आशिष शेलार विधानसभेत या मुद्द्यावर बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. “शंकासूर ही केवळ लोककलेतील व्यक्तिरेखा नसून ती अनेकांसाठी अत्यंत श्रद्धेचा विषय आहे. लोकपरंपरेतून सामाजिक प्रबोधन करण्याचे स्वागत आहे, मात्र श्रद्धास्थानाचा विपर्यास होत असेल तर त्याकडे सरकार दुर्लक्ष करणार नाही. (series) याप्रकरणी अनेक लोकप्रतिनिधींची निवेदने मिळाली असून पोलिसांमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, या विषयाची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयालाही माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.”
कथानक ही वेब सीरिज श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील खेळ एका रहस्यमयी पद्धतीने पडद्यावर मांडते. कोकणातील स्थानिक संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर ही कथा विणली गेली आहे.तगडी स्टारकास्ट या सीरिजमध्ये अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी यांच्यासह मंगेश देसाई, वीणा जामकर, यतीन कार्येकर आणि ‘गाव गाता गजाली’ फेम रोहन सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.ओटीटी प्लॅटफॉर्मवरील डिजिटल कॉन्टेन्टवर सेन्सॉरशिप नसल्यामुळे (series) अनेकदा प्रादेशिक संस्कृती आणि धार्मिक परंपरांचे चुकीचे चित्रण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विधानसभेतील या भूमिकेनंतर आता ‘झी ५’ प्रशासन या सीरिजबाबत काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?