काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काल एका कार्यक्रमात मी जिल्ह्याच्या राजकारणात एकटा पडलो आहे,(scam)असं वक्तव्य केलं होतं. त्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता सतेज पाटील यांना सल्ला दिलाय. “मी एकटा पडलेलो आहे असं म्हटलं की घोटाळा होतोय. हे सर्व जनरल निवडणुकीमध्ये बोलणं ठीक आहे. असं बोलून त्यांना सहानुभूती मिळू शकेल. मात्र गोकुळ, विधान परिषदेच्या निवडणुकीत एकटा पडलोय म्हटलं की घोटाळा होत. बहुतेक याचा पराभव होतोय म्हणून लोक त्या नेत्याकडे जात नाहीत. गोकुळचे मतदार ठराविक आहेत ते फार हुशार आहेत. गोकुळ आणि विधान परिषदेला मी एकटा पडलोय, असं म्हटल्यावर काही उपयोग होणार नाही. सतेज पाटलांकडून असं बोलण्याची अपेक्षा नाही. त्यांनी लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असं सांगितलं पाहिजे”, असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना सल्ला दिलाय.

सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी शासकीय विश्रामगृह येथे महायुतीतील सर्व आमदार, खासदारांची बैठक पार पडली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच अनेक समित्या नेमण्याबाबत देखील चर्चा झाली. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी करोना संदर्भात बोलताना प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना संदर्भात आढावा आम्ही घेत असतो,(scam)असं सांगितलं. आताचा नवीन व्हेरियंट जो आहे तो जास्त गंभीर नाही. लोक अॅडमिट होत आहेत आणि बरे होऊन जात आहेत. केवळ वयस्कर लोकांना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचे वेगळे वॉर्ड करण्यासाठी सगळ्या रुग्णालय प्रशासनाला आदेश देण्यात आले असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
राज्याच्या राजकारणात दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहेत. याबाबत हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “ठाकरे बंधू एकत्र यावेत, (scam)पवार एकत्र यावेत ही सर्वांची इच्छा आहे. मात्र याचा मुहूर्त कधी आहे हे फक्त वरिष्ठ नेतेमंडळींना माहिती आहे. यासंदर्भात आम्हाला कोणतीही माहिती मिळालेले नाही. योग्य वेळ आली की कळेल. एकत्र येण्याचा निर्णय वरिष्ठ नेतेमंडळी येतील”, असे म्हणत दोन्ही पवार एकत्र येण्यावर हसन मुश्रीफ यांनी सावध भूमिका घेत वक्तव्य केलंय.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ बाबत बोलताना देखील त्यांनी ऑपरेशन टायगर वगैरे असं काही नसतं, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. “कार्यकर्त्यांना समजावून या निवडणुकीत आम्ही तुमच्या मागे कसं उभे रहणार आहेत हे सांगून, त्याचं मत आणि मन परिवर्तन करून मग पक्षाचं गणित बसवत असतो”, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
हेही वाचा :