राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. कर्जमाफीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना अखेर महत्त्वाची माहिती मिळाली असून, येत्या ५ जुलैनंतर कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. (Farmers) यासोबतच खत, फार्मर आयडी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली.

विधानसभेत बोलताना दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात अटी आणि निकषांवर सविस्तर चर्चा सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील ५६ लाखांहून अधिक शेतकरी या निर्णयाचा लाभ घेऊ शकतात. मात्र, विद्यमान अटींमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले असून, (Farmers) याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि नियुक्त उपसमिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वी ३० जूनपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि राज्यपालांच्या मंजुरीनंतरच निधी वितरित होणार असल्याने आता ५ जुलैनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी सभागृहात दिली. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्री सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खत पुरवठा, फार्मर आयडी आणि नुकसान भरपाईवर भर यावेळी कृषीमंत्र्यांनी राज्यातील कृषी व्यवस्थेबाबतही अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. आतापर्यंत नव्या अॅपच्या माध्यमातून १ लाख ११ हजार शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्यात आले असून, अॅपमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यास त्या तातडीने दूर केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. एचटीबीटी कापूस लागवडीसाठी अद्याप केंद्र सरकारकडून परवानगी मिळालेली नसल्याची माहितीही त्यांनी दिली. (Farmers) तसेच राज्यभरातील १११९ खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले असून, खत आणि बियाण्यांचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा त्यांनी केला.याशिवाय प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आयडी तयार करण्यासाठी गावोगावी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. केंद्र सरकार तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हा आयडी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुका स्तरावर कृषीभवन उभारण्याच्या मागणीवरही तातडीने कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले असून, बाधित क्षेत्रांचे पंचनामे सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा :
मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!
महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?
Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?