हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या (learn)आंदोलनामुळेच १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. ही बलिदानाची आणि कोणत्याही संकटांचा सामना करण्याची जिद्द इथल्या मातीतील प्रत्येक कणांत आणि प्रत्येक व्यक्तीच्या रक्ताच्या थेंबात खूप आधीपासूनच भिनली आहे. म्हणूनच या आधी म्हणजे सुमारे ५००-६०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मुघल, शाही, सिद्दी, डच, पोर्तुगीज, इंग्रज अशा अनेक परकीय राजवटींचा तर अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय, नैसर्गिक आपत्तींचा सामना महाराष्ट्राने कणखरपणे केला आहे.

परंतु या सगळ्या उलथापालथींमध्येही आपण आपली अस्मिता, अभिमान आणि संस्कृती कायम जपली आहे. महाराष्ट्रातील विस्मरणात गेलेल्या खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासाकरिता गेल्या चार वर्षांपासून माझी महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतात, प्रत्येक जिल्ह्यात फिरस्ती सुरू आहे. वर उल्लेखलेल्या घटनांचा परिणाम (learn)आजही इथल्या समाज मनावर उमटलेला दिसतो. तुम्ही म्हणाल खाद्यसंस्कृतीचा आणि या सर्वांचा काय संबंध? नक्कीच आहे.
खाद्यसंस्कृती म्हणजे केवळ अमुक एका भागातील अमुक एखादी ‘रेसिपी’ असा एक सर्वसाधारण समज आहे. परंतु यात तथ्य नाही. एखादा पदार्थ, एखादा जिन्नस देखील तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय व नैसर्गिक परिस्थितीचे आकलन होण्यासाठी खूप मदत करतो. त्यामुळेच उत्खननात सापडणारे धान्यांचे दाणे, स्वयंपाकाची भांडी यांवरून तज्ञांना त्या विशिष्ट कालखंडाचा व संस्कृतीचा अभ्यास करताना उपयोग होतो. मी सध्या ज्या लोकांना भेटत असते त्यांच्या माध्यमातून सुमारे ७०-८० वर्षांपूर्वीचा कालखंड तुलनेने सहजपणे उलगडतो. एखादा पदार्थ किंवा त्यावेळची अन्नधान्याची परिस्थिती कशी होती हे सांगताना आणीबाणी, दुष्काळ, रोगाची साथ, हरितक्रांती, वगैरे बाबींचा उल्लेख होतो. मी तर म्हणेन एखादा कालखंड अभ्यासताना दोन भिन्नभिन्न संस्कृतींचा झालेला सुंदर मिलाफ असो किंवा भूतकाळात झालेले सांस्कृतिक आक्रमण, या दोन्हीही बाबींचा आवर्जून विचार व्हावा. एक रीतीरिवाजीतील किंवा लोकजीवनातील एक छान गंमत सांगते.
हे आहे लग्नाच्या वेळी गायले जाणारे गाणे. बोल मराठीमध्ये आहे. मात्र हे गाणे आहे, रेवदांड्याजवळील ‘क्रेओल पोर्तुगीज’ इंडो-पोर्तुगीज यांचे. या समाजाच्या काही चालीरीती व पदार्थ हे हिंदू-ख्रिश्चन मिश्रित आहेत. उदा. आयतोली हा घावन व पाव सदृश पदार्थ. मात्र प्रचलित ब्रेड किंवा पाव ज्या पोर्तुगीजांमुळे आपल्याकडे आला तो ते पूर्वीपासून खात नसल्याचे सांगतात. अशा अनेक सांस्कृतिक गंमती-जमती संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतात. खाद्यसंस्कृती म्हणजे नुसते पदार्थ नसून त्यांच्यासोबत जोडलेल्या प्रथा-परंपरा, भक्ती, अध्यात्म, कला, स्थानिक पिके, हवामान ऋतुमानानुसार आहार यांचा सुंदर मिलाफ म्हणजे संपूर्ण खाद्यसंस्कृती. आणि म्हणूनच कोणत्याही भागातील, (learn)कोणत्याही समाजाची खाद्यसंस्कृती जाणून घेताना तेथील सध्याच्या आणि विस्मरणात गेलेल्या पदार्थांबरोबरच पिके, सणवार, प्रथा-परंपरा, जुने शब्द, गाणी, म्हणी, दागिने याविषयीही अधिकाधिक माहिती जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असतो.
विस्मरणात गेलेल्या किंवा विस्मरणाच्या मार्गावर असणारी खाद्यसंस्कृती अभ्यासताना प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक कालखंडाचा आणि सामाजिक रचनेचा वर्ण व वर्ग यांचा विचार करणे आवश्यक आहे. कारण या तीनही कालखंडातील पदार्थ वेगळे आहेत, काही पदार्थ अगदी प्राचीन काळापासून आपल्या आहारात आहेत, काही पदार्थ काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले आहेत तर काही बदल होऊन नव्या रूपात आलेले आहेत. खरेतर, पूर्वी आताप्रमाणे पाकशास्त्रावर स्वतंत्र काही लिहून ठेवण्याची पद्धत आपल्याकडे नव्हती. आहाराचा विचार आरोग्याशीच अधिकतर होत. त्यामुळे ‘मानसोल्लास’, क्षेमकुतूहलम्, सूपशास्त्र, लोकोपकार असे काही ग्रंथ आहेत ज्यात पारंपारिक पदार्थांची माहिती व त्यांची कृती मिळते.
हा पूर्वीच्या काळातील खाद्यसंस्कृतीबाबतचा एक महत्त्वाचा ठेवा असला तरी यात राजघराण्यांच्या व्यतिरिक्त इतर समाजांचा किंवा सामन्यांच्या खाद्यसंस्कृतीचा विचार झालेला नाही. तसेच महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील, प्रत्येक समाजाच्या खाद्यसंकृतीची एकत्रित माहिती कोणत्याच माध्यमांत उपलब्ध नाही. लक्षात घ्या, आपल्याला केवळ पदार्थ व त्यांची कृती जाणून नाही घ्यायची तर संपूर्ण खाद्यसंस्कृती जाणून घ्यायची आहे. आणि विशेष बाब म्हणजे याचा विचार आपल्या महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीमध्ये झाला आहे मात्र त्याची एकत्रित नोंद झालेली नाही.
आपण महाराष्ट्रीय उत्सवप्रिय आहोत त्यामुळेच आपल्याकडे प्रत्येक प्रसंगानुसार लोकगीते, नृत्य, संगीत रचलेले आहे आणि मौखिक परंपरेने ते जतन केले आहे. यातून आपल्याला लोकजीवन, खाद्यसंस्कृती बाबत पुष्कळ माहिती मिळते. शिवाय पूर्वी महिला स्वयंपाक करताना भजन, ओव्या म्हणत. त्यांचा हा भक्तिभाव त्या अन्नात नक्कीच उतरत असे. आपल्या खाद्यसंस्कृतीतील आणखी एक खास गोष्ट म्हणजे आपल्या पदार्थांचे आकार, त्यांची रंगसंगती आणि पदार्थांची भन्नाट नावे. भेंडोळे, कानवले, कोंडोळे, माडगं, अमृतफळं, वगैरे अशी बरीच मोठी यादी आहे. आकारही अगदी नावीन्यपूर्ण आणि ते घडविण्याचे कामही तितकेच कष्टाचे. परंतु पूर्वी हे महिला अगदी आवडीने आणि निगुतीने करीत असत. एकप्रकारे त्या त्यांच्यातील अभिव्यक्तीला आणि सर्जनशीलतेला व्यक्त होऊ देत असत, असे मला वाटते.
पूर्वीच्या काळातील आता काही राहिले नाही, अशी खंत प्रत्येकजण व्यक्त करत असतो. मात्र ती नेमकी कशी जतन करावी याविषयी कोणी काहीच बोलत नाही. मुळात इतकी विविधता आणि परिपूर्णता असणारी आपली खाद्यसंस्कृती आहे. मात्र दुर्गाबाई म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्रीयांनी आपल्या खाद्यपदार्थांविषयीचे औदासीन्य घालविणे गरजेचे
हेही वाचा :
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन 1 मे रोजीच का साजरे करतात?
लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून मुलानेच बापाला संपवलं; आईला मारहाण केल्याचा राग अनावर
रात्री झोपण्याआधी आहारात करा ‘या’ गुणकारी पदार्थाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल क्षणार्धात स्वच्छ