कोल्हापूर/विशेषण प्रतिनिधी : पहलगाम दहशतकांडात निष्पाप पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारल्यानंतर देशभर शोक संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. सीमेवर युद्ध सदृश्य स्थिती आहे. केंद्र शासनाने लष्कराच्या तिन्ही दलांना ॲक्शन घेण्याचे सर्वाधिकार देऊन टाकले आहेत(politics). सौदी अरेबिया चा दौरा अर्ध्यावर सोडून माय देशी परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचा नियोजित दौरा रद्द केला आहे.

देशातील सर्वच राजकीय(politics) पक्षाच्या नेत्यांनी पहलगाम विषयावर केंद्र शासनाच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर कोणीही नेता टीका करताना दिसत नाही. कातडीने हल्ला करा, युद्धाला तोंड फोडा असे कोणीही म्हणत नाहीत. अपवाद फक्त ठाकरे गटाच्या संजय राऊत यांचा आहे. त्यांना युद्धाची भलतीच घाई झाली आहे. नरेंद्र मोदी अजूनही गप्प का असा सवाल विचारताना ते इंदिराजी गांधी यांचा दाखला देत आहेत.
हमास दहशतवादी संघटनेने इसराइलवर अचानक हल्ला केला. एका रात्रीत हजारो क्षेपणास्त्रे डागली. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी अवघ्या 24 तासात गाझापट्टीवर तुफानी हल्ला चढवला होता. अशाच प्रकारची कारवाई संजय राऊत यांना हवी आहे. आमचे सरकार असते तर आम्ही 24 तासात पाक वर हल्ला केला असता. 56 इंचाची छाती काय उपयोग याची? नरेंद्र मोदी नटनट्यांच्या कार्यक्रमाला जातात.
निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आता तर ते मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. सीमेवर युद्धजन्य स्थिती असताना हे फिरताना दिसतात. त्यांना गांभीर्य नाही. तुम लढो हम कपडे संभालते है असा त्यांचा एकूण अविर्भाव आहे. अशी जहाल भाषा संजय राऊत (politics)हे पंतप्रधानांच्या संदर्भात वापरतात.
इंदिराजी गांधी या कणखर पंतप्रधान होत्या. बांगला लढ्यात उतरण्यास त्यांनी विलंब केला नव्हता. ते युद्ध मी पाहिले आहे. असेही ते सांगतात. बांगला युद्ध 54 वर्षांपूर्वी झाले, तेव्हा संजय राऊत यांचे वय किती होते याचा खुलासा खर्च त्यांनीच करायला हवा. युद्ध म्हणजे “उचलली जीभ लावली टाळ्याला”इतके सोपे नसते.

पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना गोळ्या घालून मारले. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ताबडतोब राजीनामा देणे आवश्यक होते. मुंबईवर 26/ 11 चा हल्ला झाला तेव्हा काँग्रेसने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांचा शरद पवार यांनी राजीनामा घेतला होता असे त्यांनी म्हटले आहे.
वास्तविक संजय राऊत (politics)यांनी शुक्रवारी मीडियाला या संदर्भात अर्धसत्य सांगितले आहे. विलासराव देशमुख यांचा काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा तेव्हा राजीनामा घेतला होता. 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार धरून देशमुख यांचा राजीनामा काँग्रेस श्रेष्ठींनी तेव्हा घेतलेला नव्हता. 26/ 11 चा हल्ला झाल्यानंतर काही दिवसांनी विलासराव देशमुख यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पडझड झालेल्या ताज हॉटेलला भेट दिली होती. तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे अभिनेता असलेले चिरंजीव रितेश देशमुख आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे दोघे होते.
मुख्यमंत्री देशमुख यांची ताज हॉटेलला दिलेली भेट म्हणजे एक प्रकारची सहल होती अशी टीका त्यांच्यावर झाल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता. मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेत कमालीच्या त्रुटी ठेवल्या आणि त्यामुळेच अजमल कसाबसह दहा अतिरेकी यांना मुंबईत सहज प्रवेश करता आला असा ठपका ठेवून विलासराव देशमुख यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यात आलेला नव्हता.
मुंबईवर 26/ 11 चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील हे होते. अशा प्रकारचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होत असताना तेव्हा पत्रकारांनी गृहमंत्री म्हणून आर आर पाटील यांची प्रतिक्रिया विचारली होती.”बॉम्बे जैसे बडे शहरो में, ऐसे छोटे बडे हादसे होते रहते है”अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यांच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रियेवर सर्वसामान्य जनतेतून टीकेची झोड उठल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आर आर पाटील यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा घेतला होता.
मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख(politics) आणि गृहमंत्री आर आर पाटील यांचा राजीनामा घेण्यात आलेला नव्हता. त्याचे कारण वेगळ्या प्रकारचे होते हे संजय राऊत यांना माहीत नाही असे नाही. पण ते मीडियाशी अर्ध सत्य बोलले. मुद्दाम बोलले. कारण त्यांना या दोघांच्या राजीनाम्याचा संदर्भ देऊन अमित शहा यांचा राजीनामा हवा आहे. पहलगाम दहशतकांडानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह अन्य कोणत्याही नेत्याने टीका केलेली नाही. उद्धव ठाकरे हे सुद्धा काही बोललेले नाहीत. फक्त संजय राऊत हेच सातत्याने बोलत आहेत.
नरेंद्र मोदी यांना पहेलगाम हल्ल्याबद्दल कोणत्याही प्रकारचे दुःख झालेले दिसत नाही. ते बिहारमध्ये जातात, सेलिब्रिटीच्या कार्यक्रमात हजेरी लावतात, मुंबईला येतात यावर त्यांचा आक्षेप आहे. पण त्यांचे नेते उद्धव ठाकरे हे कुटुंबीयांसह सहलीसाठी म्हणून परदेशात होते. पहेलगाम हल्ला झाल्यानंतर ते मुंबईला परतले नाहीत. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ठाकरे यांनी आपला प्रदेश दौरा आटोपता का घेतला नाही या प्रश्नावर मात्र संजय राऊत हे कोणतेच उत्तर देत नाहीत. त्यांना युद्ध हवे आहे आणि ते तातडीने हवे आहे. युद्धस्य कथा रम्य नसतात हे त्यांना कोणीतरी सांगायला हवे.
हेही वाचा :
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात पाकच्या कटाचे पुरावे मिळाले
भर रस्त्यात तणरुणांची स्टंटबाजी; बाईकवरुन तोल गेला अन्…; पुढे जे घडलं थराराक, Video Viral
‘तो’ पंकजा मुंडेंना पाठवत होता अश्लील मेसेज, मग पुढे घडलं भयंकर!