राज्य सरकारचा मेगा प्लॅन, कॅबिनेट बैठकीत घेतले 8 महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत आज 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सर्वात मोठी घोषणा मत्स्यव्यवसाय खात्यास कृषी क्षेत्रासारखा दर्जा देण्याची झाली आहे. यामुळे मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला गेमचेंजर निर्णयाची मोठी सौगात मिळाली आहे. याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पासह विविध खात्यांतील योजनांना भरघोस मंजुरी देण्यात आली आहे.

मंत्री नितेश राणे म्हणाले, “राज्यातील 4.63 लाख मच्छिमारांना आता शेतकऱ्यांप्रमाणे फायदे मिळणार आहेत. कृषी दरात कर्ज, वीज सवलत, विमा व सौर ऊर्जेचा लाभ, निधीची सहज उपलब्धता यांचा समावेश असणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *