आयपीएल 2026 स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी संघ निवड जाहीर करण्यात आली आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या टी20 संघात मोठे बदल पाहायला मिळाले असून (IPL) संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या घोषणेमुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

6 जूनपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली असताना शनिवारी आगामी मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. दिल्ली येथे दुपारी 1 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाची अधिकृत घोषणा केली. (IPL) यावेळी टी20 संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर यांच्याकडे देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.निवडलेल्या संघात श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव आणि वैभव यादव यांचा समावेश आहे. संघात अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
भारतीय संघाचा दौरा आयर्लंडमधील दोन टी20 सामन्यांनी सुरू होणार आहे. पहिला सामना 26 जून रोजी बेलफास्ट येथे खेळवला जाणार असून दुसरा टी20 सामना 28 जून रोजी त्याच मैदानावर रंगणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ थेट इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे.इंग्लंड दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील सामने 1 जुलै रोजी चेस्टर ले स्ट्रीट , 4 जुलै रोजी मँचेस्टर , 7 जुलै रोजी नॉटिंघम , 9 जुलै रोजी ब्रिस्टल आणि 11 जुलै रोजी साउथम्प्टन येथे होणार आहेत. (IPL) त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार असून 14 जुलै रोजी बर्मिंघम , 16 जुलै रोजी कार्डिफ आणि 19 जुलै रोजी लॉर्ड्स येथे सामने पार पडतील.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यात ७२ हजार जणांचे मोफत रेशन बंद
भारत-व्हेनेझुएला ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन भागीदार
पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज काय आहे अपडेट?