बीड येथील महाविद्यालयीन तरुणीने धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती होती. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळालेला असून तो रद्द करण्यासाठी आता धाराशिव पोलीस न्यायालयात अपील करणार आहेत. याबाबतची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
अभिषेक कदम असं आरोपीचं नाव आहे. पीडित मुलीचं लग्न ठरलं होतं. मात्र अभिषेक तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता. याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने धाराशिव येथील मामाच्या घरी गळफास घेतल्याचा आरोप आहे. या घटनेला एक महिना पूर्ण झाला, तरी न्याय मिळत नसल्यामुळे तिच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहित कारवाईची मागणी केली होती.