घोड्यांमुळे वाचला 28 कोल्हापूरकरांचा जीव; नेमकं घडलं काय जाणून घ्या

जम्मू-काश्मीर येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळं संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येत जण जखमी आहेत. काश्मीरमधील पहलगाम येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही महाराष्ट्रातील काही पर्यटक(Tourist) जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहेत. तर काही पर्यटक या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.

कोल्हापूरातून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या 28 पर्यटकांचा जीव वाचला आहे. पहलगाममध्ये पोहोचण्यासाठी घोडे वेळत उपलब्ध झाले नाही आणि यामुळेच या पर्यटकांचा जीव वाचला आहे. गोळीबार झालेल्या घटनेपासून अवघ्या दीड किमीवर हे पर्यटक उभे होते. त्यामुळं दैव बलवत्तर म्हणून या पर्यटकांचा(Tourist) जीव वाचला आहे, असंच आता म्हणावं लागेल. या 28 जणांच्या चमूला ट्रॅव्हल्स ड्रायव्हरने उधर फायरिंग सुरू है मत जाओ” हे सांगताच हे सर्व पर्यटक माघारी फिरले. या घटनेमुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव या पर्यटकांना आला.

हा सर्व थरारक अनुभव जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेलेल्या अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आला आहे. कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातून काश्मीरच्या पर्यटनासाठी(Tourist) 28 जणांचा चमू गेला होता. मंगळवारी दुपारी पहलगाम पर्यटनासाठी जाण्यासाठी हे सर्वजण तयारी करत होते. ट्रॅव्हल्सने हे सर्वजण पहलगांपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर पोहोचले होते.

28 जणांना एकाच वेळी घोडे उपलब्ध होण्यासाठी काही वेळ लागला. घोडे उपलब्ध होताच हे सर्वजण घोड्यावर बसू लागले. तेवढ्यात ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने “उधर फायरिंग सुरू है मत” जाओ असं सांगताच या सर्वांना धक्का बसला. हे सर्वजण घोड्यावरून खाली उतरले. हे सर्व पर्यटक सुखरूप परतीच्या मार्गावर लागले आहेत.

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल.

पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. 6 वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी 1.15 वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल. मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत, असं ट्विट महाराष्ट्र CMOने केलं आहे.

हेही वाचा :

पिकलेल्या आंब्यासोबत घरी बनवा आंबट-गोड चटणी

आनंदाची बातमी! ८ दिवसांत महिलांच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये

उन्हाळ्यात स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी काय करावे? जाणून घ्या


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *