शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची पदे धोक्यात आली आहेत. ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या तब्बल 9 नगरसेवकांची पद धोक्यात आहेत. याबाबत थेट कोर्टात धाव घेण्यात आली. ज्याने एकच खळबळ उडालीये.

शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची पदे धोक्यात आली आहेत. ज्याने एकच मोठी खळबळ उडालीये. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या काही नगरसेवकांविरोधात निवडणूक शपथपत्रात कथितरित्या चुकीची, अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी न्यायालयात इलेक्शन रिट पिटीशन दाखल करण्यात आली. ज्याने या नगरसेवकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. (positions) याबाबत ॲड. रोहिदास मुंडे यांनी ही माहिती दिली. संबंधित नगरसेवकांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, बांधकामे, आर्थिक माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे व मालमत्ता लपविल्याचाही मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांनुसार निवडणूक शपथपत्रात चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण मानले जाते. (positions) जनप्रतिनिधींनी मतदारांपासून तथ्य लपविल्यास संबंधित निवडणूक रद्द होण्यासह लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील तरतुदींनुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे ॲड. रोहिदास मुंडे यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 33A, कलम 36 तसेच भारतीय न्यायव्यवस्थेने वेळोवेळी दिलेल्या आदेशांनुसार उमेदवाराने सत्य व संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. खोटी माहिती सादर करणे किंवा तथ्य लपविणे हे मतदारांची दिशाभूल करणारे कृत्य मानले जाते. या प्रकरणात रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, साक्षी मढवी, दर्शना म्हात्रे, अर्चना पाटील, दिपाली भगत आणि स्नेहा पाटील या नगरसेवकांविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली.सदर बाब न्यायालयाच्या विचाराधीन असून संबंधित उमेदवारांविरोधात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमध्ये शपथपत्रातील माहितीबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. (positions) यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांचे पद थेट धोक्यात आली आहेत. तब्बल 9 नगरसेवकांची पदे धोक्यात आहेत. यावर आता शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, याने एकच खळबळ उडालीये.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?