पाणी जपून वापरा! 15 मेपासून तुमच्या नळाला कमी पाणी येणार पालिकेचा मोठा निर्णय

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात धरणांमधील पाणीसाठ्याने निचांकी पातळी गाठली आहे. कडक उन्हाळा, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग आणि मान्सूनबाबतची अनिश्चितता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण शहर आणि उपनगरात १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल शुक्रवार, १५ मे २०२६ पासून अमलात येणार असून जोपर्यंत धरणक्षेत्रात पावसाचे आगमन होऊन साठा वाढत नाही, तोपर्यंत हे निर्बंध कायम राहतील.

महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईसाठी आवश्यक असणाऱ्या एकूण वार्षिक साठ्यापैकी सध्या केवळ २३.५२ टक्के पाणी शिल्लक आहे. सातही जलाशयांमध्ये मिळून सध्या ३ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लीटर इतकाच साठा उपलब्ध आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे, तसेच ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाळ्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानेदिलेल्या सल्ल्यानुसार प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

ही पाणी कपात केवळ मुंबई महापालिका क्षेत्रापुरती मर्यादित नसून, मुंबईकडून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे आणि भिवंडी-निजामपूर महानगरपालिका क्षेत्रांतही लागू असेल. जरी परिस्थिती गंभीर असली तरी, भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणांच्या राखीव साठ्यातून शहराला दिलासा मिळण्याची शक्यता आहे, (Water levels) त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी पालिकेने नागरिकांना काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारण्यास सांगितले आहे. (Water levels) यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेसाठी शॉवरचा वापर टाळून बादलीने अंघोळ करणे आणि दाढी किंवा दात घासताना नळ विनाकारण सुरू न ठेवणे यांचा समावेश आहे. घरामध्ये किंवा गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची गळती होत असल्यास ती तातडीने थांबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नळांना विशेष ‘नोझल’ बसवल्यास सुमारे ६० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होऊ शकते, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

तसेच, वाहने धुण्यासाठी पाईपचा वापर न करता ओल्या कापडाने गाडी पुसून काढण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हॉटेल आणि उपहारगृहांनी ग्राहकांना विचारल्याशिवाय पाणी देऊ नये, (Water levels) जेणेकरून न वापरलेले पाणी वाया जाणार नाही. मुंबईकरांनी या कठीण काळात प्रशासनाला साथ देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा, जेणेकरून मान्सून आगमनापर्यंत उपलब्ध साठा पुरेसा पडेल, अशी विनंती पालिकेने केली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?