पुण्यातून एका धक्कादायक बातमी समोर येत आहे. बुधवार पेठेतल्या महिलांना पोलिसांनी एक प्रश्न विचारला आणि मोठं सत्य समोर आलं, तर जाणून घ्या काशामुळे झाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची पोलखेल?

महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी पुणे याठिकाणी बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र करण्यास सुरुवात केली आहे.(women) नुकताच पुण्यातील प्रसिद्ध रेड लाईट एरिया, बुधवार पेठे येथे फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं आहे मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई पोलिसांच्या एका विशेष शोधमोहिमेचा भाग होती, जी रविवार रात्री उशिरापासून सोमवार सकाळपर्यंत राबवण्यात आली.पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठ स्थित माचिस बिल्डिंग आणि बाजूच्या परिसरातील चौकशी सुरु असताना, पोलिसांनी काही महिलांच्या बोलण्यात काहीसा फरक जाणवला ज्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला. महिलांची भाषा पश्चिम बंगाल येथील बंगालीपेक्षा थोडी वेगळी होची. महिलांच्या बोलण्यात बांगलादेशी लहेजा स्पष्ट जानवत होता
जेव्हा पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली, तेव्हा दोन महिलांनी पश्चिम बंगाल येथील असल्याचा दावा केला. संशय दूर करण्यासाठी पोलिसांनी महिलांना दोन प्रश्न विचारले. जेव्हा महिलांना विचारण्यात आलं की, भारताचं राष्ट्रगीत काय आहे? यावर त्या गप्प झाल्या, त्यांना राष्ट्रगीच्या ओळी देखील येत नव्हत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांनी भारताचे पंतप्रधान कोण आहेत? असा प्रश्न विचारला. (women) याचं देखील महिलांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही.एवढंच नाही तर, पश्चिम बंगाल येथील त्यंच्या कथित गावांबद्दल विचारण्यात आल्यानंतर देखील त्यांनी काहीही बोलता आलं नाही आणि महिला घाबरल्या या प्रश्नांमुळे स्पष्ट झालं की, महिला भारतीय नागरीक नव्हत्या, त्या बेकायदेशीरपणे सीमा पार करून भारतात वास्तव्य करत होत्या.
वेश्याव्यवसायाचा बेकायदेशीर व्यापार डीसीपी कृषिकेश रावले यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे. पाच महिला बेकायदेशीरपणे सीमा पार करून भारतात दाखल झालेल्या. चौकशीत असं देखील समोर आलं आहे की, स्वतःच्या इच्छेने त्या वेश्याव्यवसायात सक्रिय होत्या. (women) त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी कोणत्याच प्रकारचा पासपोर्ट, व्हिजा किंवा ओळखपत्र नव्हतं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध स्थलांतरितांविरोधात ही मोहीम आक्रमकपणे राबवली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या 11 महिन्यांत पुणे शहरात एकूण 95 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने स्थलांतरित सापडल्याने शहराच्या अंतर्गत सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत
हेही वाचा
चाकूहल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू
महिला की पुरुष? कोणाचे हृदय असते जास्त स्ट्राँग? तज्ज्ञ म्हणतात