पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ नवे दर आजपासून लागू

जागतिक स्तरावरील राजकीय घडामोडी आणि वाढत्या तणावाचा थेट फटका भारतीय इंधन बाजाराला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळे तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा दरवाढीचा निर्णय घेतल्याने देशभरात महागाईचा भडका उडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

तीन दिवसांत दुसऱ्यांदा इंधन महागले; नवे दर लागू मंगळवार, १९ मे २०२६ पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये नवीन वाढ लागू करण्यात आली आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी, (Petrol and Diesel)म्हणजेच १५ मे रोजी पेट्रोलच्या दरात ₹३.१४ आणि डिझेलच्या दरात ₹३.११ ची मोठी वाढ झाली होती, ज्यानंतर पेट्रोल ₹९७.७७ आणि डिझेल ₹९०.६७ प्रति लिटरवर पोहोचले होते. आता या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून, पेट्रोल ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी महागले आहे.

या ताज्या दरवाढीनंतर, देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पेट्रोल आता ९७.७७ रुपयांवरून ९८.६४ रुपये प्रति लिटर झाले आहे. तसेच, डिझेलचा दर ९०.६७ रुपयांवरून थेट ९१.५८ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. एप्रिल २०२२ नंतर इंधनाच्या किमतींनी गाठलेला हा सर्वोच्च उच्चांक असून, लागोपाठ होत असलेल्या या दरवाढीमुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे.

जागतिक संकट आणि सर्वसामान्यांच्या खिशावर वाढता भार या इंधन दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी कारणे आहेत. (Petrol and Diesel) प्रामुख्याने मध्य पूर्व भागातील वाढता लष्करी तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील मालवाहतुकीत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी मिळणाऱ्या सवलतींना नकार दिल्याने जागतिक बाजारात तेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे, ज्याचा थेट फटका भारताला सोसावा लागत आहे.

इंधनाच्या किमतीत झालेल्या या वाढीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. वाहतूक महागल्यामुळे जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला आणि दैनंदिन वापराच्या पेयांच्या किमती वाढण्याचा थेट धोका निर्माण झाला आहे. (Petrol and Diesel) या दरवाढीचा सर्वाधिक फटका मालवाहतूकदार, व्यावसायिक, रोज प्रवास करणारे नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य कुटुंबांना बसणार असून, त्यांच्या मासिक खर्चात मोठी वाढ होणार आहे.

हेही वाचा

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी औषध दुकाने बंद..?

होर्मुझच्या नाकाबंदीमुळे खरीप हंगामावर सावट

मिरजेत एकाच रस्त्यासाठी तीनवेळा निधी..!