मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री(actress) प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. अलीकडेच एका मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या अफेअरबद्दल मोठा खुलासा करत चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. ती म्हणाली, “डोक्याची मंडई होणार असेल तर माझ्या आयुष्यात मानसिक शांततेला अधिक प्राधान्य आहे.”

प्राजक्ताला(actress) नेहमी विचारलं जातं, “तू लग्न कधी करणार?” यावर तिने स्पष्ट सांगितले की, “मी माझ्या आईला मुलगा बघायला सांगितलं आहे.” मात्र यासोबतच तिने तिच्या भूतकाळातील नात्याविषयीही खुलेपणाने सांगितले.
प्राजक्ताने सांगितले की, तिच्या आयुष्यात एक खास व्यक्ती होती, पण नातं फार काळ टिकले नाही. ती म्हणाली, “मी प्रेमात पडते, पण नंतर कळतं की हे शेवटपर्यंत टिकणार नाही. त्यामुळे योग्य वेळी नात्यातून बाहेर पडणं हेच शहाणपण आहे. मी समोरच्या व्यक्तीला स्पष्ट सांगितलं की, मित्रा, सगळं छान आहे पण जरा प्रॉब्लेम आहे, तू घरी जा, आपण थांबूयात.”
तिने पुढे उघड केलं, “तो खोटं बोलत होता, मी त्याला पुराव्यांसह पकडलं आणि मग त्याला रितसर ‘जय महाराष्ट्र’ केलं.” प्राजक्ता म्हणाली, “अध्यात्मामुळे माझ्या मानसिक आणि भावनिक गरजा कमी झाल्या आहेत. गरजाच संपल्या तर नातंही कशावर टिकणार? आजच्या काळात नात्याच्या टिकण्याची गॅरंटी कोण देणार?” असे ती म्हणाली.

तिच्या या धाडसी वक्तव्यामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोशल मीडियावरही ती कायम सक्रिय असून, चाहत्यांसोबत स्वतःचे विचार, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहते.
हेही वाचा :
भारतात लवकरच लाँच होणार Vivo X200 FE!
पत्नीला रील्स बनवण्याचा नाद, पुरुषांच्या कमेंट्सचा पतीला राग, दारुच्या नशेत लाथ घातली, अन्….
एसटीच्या तिकीटांमधील सवलत महिलांना महागात पडण्याची भीती, धक्कादायक बातमी समोर