२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा जीव गेला, ज्यात हिंदू पर्यटकांचा समावेश होता. या घडामोडीवर प्रसिद्ध अभिनेत्री(actress) हिना खान हिने तिच्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हिना खान मूळची काश्मीरची असून, या घटनेमुळे ती प्रचंड दुःख आणि संताप व्यक्त करत आहे.

हिना खानने(actress) पोस्टमध्ये म्हटले की, “संवेदना. काळा दिवस. आज मला भारतीयांची आणि विशेषतः हिंदू समाजाची माफी मागायची आहे. ही घटना इतकी क्रूर आणि निर्दयी होती की त्यावर शब्द नाहीत. त्या दहशतवाद्यांनी निर्भयपणे निष्पाप नागरिकांना आपला लक्ष्य बनवलं. यामुळे माझ्या आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे.”
ती पुढे म्हणाली की, “हे दु:ख फक्त तिचं नाही, तर त्या प्रत्येकाचं आहे ज्यांनी आपले प्रियजन गमावले. ही वेदना प्रत्येक भारतीय व्यक्तीला समजतेय. मी प्रार्थना करते की मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळो.”
तिनं आणखी एक महत्त्वाची गोष्ट मांडली. हिना म्हणते, “जे लोक या कृत्याचं समर्थन करत आहेत, ते कोणत्याही धर्माचे असू शकत नाहीत. त्यांनी जे केलं ते मानवतेच्या विरोधात आहे. काही मुस्लिम लोकांमुळे आज मला लाज वाटते. पण मी भारतीयांना सांगू इच्छिते, कृपया आम्हाला वेगळं करू नका. आम्ही वेगळे नाही. भारत आमचं घर आहे, आमची मातृभूमी आहे.”
या भावनिक पोस्टमुळे हिना खानने आपली संवेदनशीलता आणि देशप्रेम पुन्हा एकदा दाखवली आहे. तिच्या या कृत्यामुळे तिची प्रशंसा होत आहे.
हेही वाचा :
राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोल्हापूरात प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणावर हल्ला; नग्न करून लोखंडी रॉडने मारहाण
इचलकरंजीत ज्यादा परताव्याच्या आमिषाने डॉक्टरला तब्बल 93 लाखांचा गंडा…