शरद पवार असे का बोलले?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहेलगाम दहशतकंडाबद्दल केंद्रशासन जाऊन निर्णय घेईल त्याला आमचे समर्थन असेल. दहशतवाद्यांना कायमची अद्दल घडवावी लागेल. अशी भूमिका स्पष्ट करताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी, पहेलगाम दहशतवाद्यांनी तुमचा धर्म कोणता असे विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या यातलं सत्य काय ते मला माहिती नाही. असे सांगून सर्वांनाच चकित करून सोडले आहे. तर खासदार सुप्रिया सुळे(political) यांनीही”फायरिंग इन्सिडन्स”असे विधान करून दहशतकांडाचं गांभीर्य कमी केले आहे.

शरद पवार यांच्याबरोबरच आता त्यांचंही राजकारण(political) काहीस अनाकलनीय वाटू लागले आहे. पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवण्याची घेतलेली भूमिका, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेले टीका, काश्मीरमधील पर्यटकांच्या एअरलिफ्टिंग वरून रंगलेली श्रेयवादाची चर्चा, आणि शरद पवार यांची अनाकलनीय भूमिका, तसेच पानिपत स्मारकाच्या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या सर्वच प्रवक्त्यांच्या रद्द करण्यात आलेल्या नियुक्त्या असं या चार दिवसातील महाराष्ट्राचे राजकारण आहे.

पहेलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पुरुष पर्यटकांना कलमापठण करण्यास सांगितले, नंतर तुमचा धर्म कोणता असे विचारून गोळ्या घातल्या, एक पर्यटक महिला दयेची भीक मागत असताना तिच्या पतीला ठार मारले आणि”जा, जाऊन सांग तुझ्या मोदीला”
असा दम दिला. दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला आणि हिंदू पर्यटकांना गोळ्या झाडून मारले हे संपूर्ण जगाला माहित आहे. सांत्वन करण्यासाठी गेलेल्या शरद पवार यांना एका मृत पर्यटकाच्या भाऊ कुटुंबीयांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारला होता असे सांगितले. पण तरीही दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या याबद्दलचे नेमके सत्य मला माहित नाही असे चकित करणारे विधान शरद पवार यांनी केले आहे.

पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी फक्त पुरुष पर्यटकांना मारले. लहान मुलांना, मुलींना, महिलांना त्यांनी हात सुद्धा लावला नाही असे अधोरेखित करून सांगण्याची शरद पवारांना काय गरज होती? दहशतवाद्यांनी सरसकट पर्यटकांना मारले नाही असे ते का बोलले हे कळावयास मार्ग नाही.

एअरलिफ्टिंग वरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे(political) गट यांच्यात श्रेय वादाची लढाई सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन हे काश्मीरला गेलेले असताना एकनाथ शिंदे यांनी तेथे जायची गरज काय होती असा सवाल ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

ठाणे शहरात एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाचे फलक लागले आहेत. हा श्रेय वादाचा प्रकार असला तरी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी हे फलक लावले आहेत. तथापि मुळातच असे डिजिटल फलक लावले जाणे हे चुकीचे आहे. ज्यांनी कधी विमान प्रवास केला नाही त्यांना शिंदे यांनी विमानाने महाराष्ट्रात आणले ही शिंदे गटाच्या आमदाराची प्रतिक्रिया सुद्धा चीड आणणारी आहे.

पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक उभा करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्याला पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला आहे. आव्हाड यांची भूमिका चुकीची आहे असे या पक्षाचे प्रमुख प्रवक्ते महेश तपासे यांनी बैठकीत सांगितल्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेवढे प्रवक्ते आहेत त्यांचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. महेश तपासे यांचे आजोबा गणपतराव तपासे हे राज्यपाल होते आणि त्यांनीच पूर्वी पानिपत येथे स्मारक उभा केले आहे. म्हणूनच त्यांनी नव्या भव्य स्मारकाला राष्ट्रवादी विरोध करू नये अशी भूमिका घेतली आणि ती शरद पवार यांच्यासह जयंत पाटील यांनाही पचनी पडली नाही.

सुप्रिया सुळे यांनी पहलगाम घटनेवर हा दहशतवादी हल्ला आहे असे स्पष्ट शब्दात सांगणे अपेक्षित होते पण त्यांनी”फायरिंग इन्सिडन्स”इतक्या मवाळ भाषेत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वसामान्य जनतेला त्यांची अशी मवाळ प्रतिक्रिया आवडलेली नाही.

दहशतवाद्यांनी पहलगाम येथील पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि हे पर्यटक हिंदू धर्मीय आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. पण तरी शरद पवार म्हणतात की सत्य काय आहे हे मला माहित नाही. कुणालाही न पटणारी त्यांची ही भूमिका आहे. पण शरद पवार यांचे आजपर्यंतचे राजकारण पाहता त्यांची ही सुद्धा भूमिका अनाकलनीय आहे.

हेही वाचा :

राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

कोल्हापूरात प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणावर हल्ला; नग्न करून लोखंडी रॉडने मारहाण

“मी समस्त हिंदूंची माफी मागते, पण…”, प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानची पोस्ट चर्चेत