गुजरातचं प्लेऑफमधील स्थान निश्चित, मुंबईचं पुनरागमन, चेन्नई बाहेर

आयपीएल 2025 च्या हंगामात आतापर्यंत 39 सामने खेळण्यात आले आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स वगळता सर्व संघांनी 8-8 सामने खेळले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत टॉप-4 मध्ये 3 संघ आहेत ज्यांनी अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही.

गुजरात टायटन्सने आयपीएलचा 39 वा सामना 39 धावांनी जिंकून प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. गुजरातचा संघ सध्या गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. गुजरातचे आता 6 सामने शिल्लक आहेत, त्यापैकी किमान 3 सामने जिंकायचे आहेत. गुजरातने 2 सामने जिंकले तरी प्लेऑफचं तिकीट पक्क करेल. मात्र कोणत्याही संघाच्या निकालांवर अवलंबून न राहायचे असल्यास गुजरातला 3 सामना जिंकावे लागतील.

दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. तिन्ही संघ त्यांच्या पहिल्या आयपीएल जेतेपदासाठी मैदानात आहेत. दिल्लीने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत, आरसीबी आणि पंजाबने 8-8 सामने खेळले आहेत आणि दोघांनीही 5-5 सामने जिंकले आहेत. जर या संघांनी आणखी 4 सामने जिंकले तर त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित मानला जाऊ शकतो.

लखनौ 8 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. लखनौला 4 सामने जिंकावे लागतील पण त्यांना त्यांचा नेट रन रेटही थोडा सुधारावा लागेल. दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सलग पराभवानंतर चांगले पुनरागमन केले आहे. सध्या मुंबईने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत, पुढील 6 सामन्यांपैकी किमान 5 सामने जिंकावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *