राज ठाकरे यांच्याकडून जेव्हा दुधात मिठाचा खडा पडतो!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहेलगाम येथे निष्पाप पर्यटकांना त्यांच्या नातलयांसमोरच गोळ्या झाडून ठार मारल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. देशातील सर्वच राजकारण्यांनी दहशतवाद्यांना, त्यांना रसाचे पुरवणाऱ्यांना, आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा असे धाडस होणार नाही असा धडा शिकवा अशी कणखर भूमिका घेतली होती. केंद्र शासन जो निर्णय घेईल तो आम्हास मान्य असेल असे देशातील सर्वच राजकीय नेत्यांनी(political leader) जाहीरपणे सांगितले होते.

आता ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर देशभर जल्लोष सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया “दुधात मिठाचा खडा”टाकणारी आहे. तर संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूर च यश हे नरेंद्र मोदी यांचा नाही तर लष्कराच्या तिन्ही दलाचे आहे. अशी ती रक्कस प्रतिक्रिया दिली आहे.

पहेलगाम दहशतकांड घडले तेव्हा हे देशावर आलेले संकट समजून राज ठाकरे(political leader) यांनी परदेश दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी येणे आवश्यक होते पण ते सावकाश आले. दहशतवाद्यांना धडा शिकवला पाहिजे पण त्यावर पाकिस्तानशी युद्ध हे उत्तर नव्हे. मॉक ड्रिल वगैरे काय करता? युवा पिढी व्यसनात सापडली आहे. त्यांना अमली पदार्थ कोठून उपलब्ध होतात त्याचा आधी शोध घ्या असे ते सांगतात.

आता दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि व्यसनाधीन पिढी याचा परस्परांशी संबंध काय? पाकिस्तान आधीच बरबाद झाला आहे, त्याला आणखी काय बरबाद करणार? हा त्यांचा सवाल असाच बुचकळ्यात टाकणार आहे. मग दहशतवाद्यांचा उपयोग सैन्यासारखा करणाऱ्या पाकिस्तानशी भारताने कसा व्यवहार करावा याचे मार्गदर्शनही राज ठाकरे यांनी केले असते तर बरे झाले असते.

पाकिस्तानला युद्धाचीच, शस्त्राचीच भाषा समजत असेल तर त्यांना काश्मिरी गुलाब पाठवून पाक विरुद्ध गांधीगिरी आंदोलन करावे काय? कोणत्याही विषयावर आंदोलन करताना त्यावर खळखट्याक किंवा कानाखाली आवाज हे पर्याय असू शकतात काय असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारला तर त्याचे उत्तर “कानाखाली आवाज” याच्याशिवाय वेगळे असणार नाही.

पहलगाम येथे पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले आहे. 26 स्त्रियांच्या कपाळावरचे कुंकू या दहशतवाद्यांनी पुसले आहे. मारल्या गेलेल्या पर्यटकांमध्ये सहा पर्यटक हे महाराष्ट्रातील होते. त्यामुळे महाराष्ट्रात शोक संतप्त वातावरण होते. राज ठाकरे यांनी ते परदेशातून परत आल्यानंतर मृत पावलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांचे शांत्वन करणे आवश्यक होते.

भारताशी थेट युद्ध करता येत नाही म्हणून पाकिस्तानाने दहशतवाद्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे हे जग जाहीर असताना पाक बरोबर युद्ध नको ही त्यांची भूमिका अनाकलनीय आहे. ऑपरेशन सिंदूर सक्सेस झाल्यानंतर आनंद व्यक्त करण्याऐवजी राज ठाकरे(political leader) हे भलतेच काही बोलताना दिसतात. त्यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही संवेदनशील राजकारण्याची आहे असे कोणीही म्हणणार नाही. देशात युद्धसदृश्य वातावरण असताना अमली पदार्थ, व्यसनाधीन युवा पिढी हा विषय आत्ताच त्यांना महत्त्वाचा का वाटला? त्यांनी उपस्थित केलेला विषय महत्त्वाचा असला तरी राज ठाकरे यांचे टाइमिंग मात्र चुकले आहे.

पहेलगाम दहशतकांड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 24 तासात पाकिस्तानला करारा जबाब दिला पाहिजे होता असे वक्तव्य संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी केले होते. तेव्हा त्यांनी 1971 चे युद्ध जिंकणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे नाव घेतले होते. तशी धडक कारवाई त्यांना नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षित होती. दहशतकांड घडल्यानंतर पंधरा दिवसाने ऑपरेशन सिंदूर सक्सेस झाल्यानंतर त्याचे श्रेय ते नरेंद्र मोदी यांना देत नाहीत. लष्कराच्या तिन्ही दलांना ते याचे श्रेय देतात. हे यश निश्चितच लष्कराचे आहे, पण त्यांना कारवाई करण्याचे मुक्त स्वातंत्र्य देणाऱ्या केंद्र शासनाचे सुद्धा विशेषतः नरेंद्र मोदी यांचे ते यश आहे असे ते का म्हणत नाहीत?

हेही वाचा :

फायटर जेटने एअर डिफेन्स सिस्टीमला क्षणात केलं नष्ट; पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर धमाकेदार Video Viral

ऑपरेशन सिंदूरचा ‘मुंबई इंडियन्स’ला फायदा, बीसीसीआयचा मोठा निर्णय

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! देशभरात मागील 36 तासांपासून पेट्रोल- डिझेल पुरवठा विस्कळीत